शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:10 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठरावातून काढून टाकल्याचे पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी संसदेत कबूल केले आहे.

जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता एनआयएने तपास सुरू केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी  टीआरएफने घेतली होती. दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावातून काढून टाकल्याचे कबूल केले आहे.

टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधीत एक दहशतवादी संघटना आहे. टीआरएफने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाम हल्ल्यासाठी भारताने टीआरएफवर आरोप केला नव्हता, तर सर्वात आधी टीआरएफने स्वतः हल्ल्याची जबाबदारी घेतली.

२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक

पाकिस्तानने UNSC ने पाठवलेल्या प्रस्तावातून TRF चे नाव काढून टाकले आहे. पाकिस्तान सध्या UNSC च्या 10 सदस्यांमध्ये समाविष्ट आहे.

संसदेत बोलताना इशाक दार म्हणाले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित निषेधाचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून आला होता आणि त्यात फक्त पहलगामचा उल्लेख होता, जम्मू आणि काश्मीरचा नाही. यावर पाकिस्तानकडून आक्षेप घेण्यात आला.

"या प्रस्तावात हल्ल्यासाठी टीआरएफला जबाबदार धरण्यात आले होते. हा प्रस्ताव पाकिस्तानला मान्य नव्हता आणि आम्ही बदल न करता प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, असंही इशाक दार म्हणाले.

'प्रस्तावात बदल केले'

इशाक दार म्हणाले की, आम्ही संयुक्त राष्ट्रांमधील आमच्या स्थायी प्रतिनिधीला या ठरावाला विरोध करण्यास आणि पहलगामसोबत जम्मू आणि काश्मीरचे नाव लिहिण्यास सांगितले आणि ठरावातून टीआरएफचे नावही काढून टाकण्यास सांगितले.

यानंतर त्यांना अनेक देशांकडून प्रस्ताव का बदलत आहेत असे विचारत होते, पण पाकिस्तान ठाम राहिला आणि त्यांनी प्रस्ताव बदलून टाकला, असा दावाही इशाक दार यांनी केला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत