शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

अडचणीच्यावेळी पाकिस्तानने मदत केली, आता त्यांनाच तालिबानने धमकी दिली; लाल मशीद ऑपरेशनपासून सुरू झाले वैर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:31 IST

तालिबानला १९९४ मध्ये मजबूत बनवण्याठी पाकिस्तानने मोठी मदत केली होती.

पाकिस्तान आणि तालिबान या दोन्हीमध्ये आधी खूप जवळचे संबंध होते. पाकिस्तानशिवायतालिबान्यांचे काहीच होत नव्हते. त्यांना पाकिस्तानच पैसे पुरवत होता. पण, डिसेंबर महिन्यात अफगाणिस्तानच्या पाक्तिका प्रांतामध्ये पाकिस्तानने मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानने तालिबान्यांचे एक प्रशिक्षण केंद्र होते. या हल्ल्यात ४६ जणांचा मृ्त्यू झाला. यात सर्वात जास्त लहान मुले आणि महिला होत्या. या घटनेमुळेच पाकिस्तान आणि तालिबानमध्ये मोठा वाद सुरू झाला. 

२०२५ मध्ये उड्डाण, २०२४ मध्ये जमिनीवर उतरलं विमान, कसा घडला हा टाइम ट्रॅव्हलचा चमत्कार?

या हल्ल्यानंतर तालिबानने पाकिस्तानचा बदला घेण्याचे ठरवले आणि अवघ्या चार दिवसांनी पाकिस्तानच्या सीमेवर प्रत्युत्तरादाखल हल्ला केला. या हल्ल्यात १९ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे, तर ३ अफगाण नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. 

तालिबानची स्थापना १९९४ मध्ये अफगाणिस्तानातील कंदाहारमध्ये झाली. पाकिस्तानने त्यांना संघटित करण्यात आणि मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तालिबानला सुरुवातीपासूनच पाकिस्तानकडून मोठा पाठिंबा मिळू लागला. आयएसआयने अनेक दशकांपासून आर्थिक आणि लष्करी मदत देऊन तालिबानला सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

१९९६ मध्ये, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि युएई ने अफगाणिस्तानच्या तालिबानच्या इस्लामिक अमिरातीला कायदेशीर सरकार म्हणून मान्यता दिली. नेहमीच तालिबानच्या पाठीशी असलेला पाकिस्तान आज शत्रू बनला आहे. अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात हल्ले वाढले आहेत.

तालिबानच्या विरोधानंतर पाकिस्तानने तालिबानच्या स्थापनेतील आपली भूमिका वारंवार नाकारली आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील युद्धाची खरी सुरुवात २००७ मध्ये पाकिस्तानातील लाल मशीद ऑपरेशन होती. इस्लामाबादची लाल मशीद कट्टर इस्लामी कारवायांच्या केंद्रस्थानी होती. येथूनच दहशतवादी संघटनांना पाठबळ मिळाले.

२००७ मध्ये लाल मशिदीच्या विद्यार्थ्यांनी इस्लामाबादमधील मसाज सेंटरवर हल्ला करून ९ जणांचे अपहरण केले होते. यानंतर ३ जुलै २००७ रोजी पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन सायलेन्स सुरू केले. या कारवाईत १०० हून अधिक लोक मारले गेले. यानंतर पाकिस्तानमध्ये तहरीक-ए-पाकिस्तान चा जन्म झाला. यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले.

टॅग्स :TalibanतालिबानPakistanपाकिस्तान