शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:31 IST

Pakistan Rocket Force: पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्षे झाली तेवढीच पाकिस्तानला झाली आहेत.

भारताकडून ऑपरेशन सिंदूरवेळी सपाटून मार खाल्ल्याने पाकिस्तानला रहावत नाहीय. गेल्या महिन्यात पाकिस्तानने शाहीन-३ मिसाईलची दोन-तीनदा चाचणी केली. परंतू, ते भरकटले आणि दुसरीकडेच जाऊन पडले. अशा परिस्थितीत पाकिस्तानने १४ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी रॉकेट फोर्स उभारण्याची घोषणा केली आहे. एक मिसाईल साधे उडविता येत नाही आणि हा पाकिस्तान चीनसारखी अख्खी रॉकेट फोर्स बनविण्याच्या बाता मारू लागला आहे. 

पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्षे झाली तेवढीच पाकिस्तानला झाली आहेत. परंतू, पाकिस्तानने भारताचा दु:स्वास करून अमेरिकेच्या साथीने युद्धे लादली आणि आपल्या जनतेला वाऱ्यावर, उपाशी सोडून दहशतवाद्यांना पोसण्यातच धन्यता मानली. आज भिकेला लागला तरीही पाकिस्तान काही सुधरलेला नाही. पाकिस्तानी लष्कराला भारताविरोधात लढण्यासाठी सक्षम करणे आणि दहशतवाद्यांना पोसणे हेच त्यांनी हित मानलेले आहे. 

शरीफ यांनी रॉकेट फोर्सची स्थापना केल्याची घोषणा केली आहे. रॉकेट फोर्स आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि प्रत्येक दिशेने शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम असल्याच्या बाताही त्यांनी मारल्या आहेत. पाकिस्तानची सर्व मिसाईल या चीनच्याच बनावटीच्या आहेत. ज्यांना भारताने दोन महिन्यांपूर्वीच पाणी पाजले आहे. 

पाकिस्तानकडे आहेत या मिसाईल...पाकिस्तानी सैन्याकडे सध्या ४०० किमी रेंजची एसएसएम फतेह-२ मिसाईल, ४५० किमी आणि ७०० किमीच्या रेंजसह फतेह-३ आणि फतेह-४ मिसाईल आहे. शाहीन मिसाईलही आहेत. चीनने दिलेली मिसाईल देखील आहेत. परंतू, त्यांचा वापर पाकिस्तानला करताच आलेला नाहीय. यामुळे ती भारताविरोधात कितपत यशस्वी होतील हे एक गूढच आहे. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानने डागलेल्या मिसाईल भारताने आकाशातच उध्वस्त करून टाकल्या होत्या. एक मिसाईल तर त्यांचे जिवंत सापडले होते. ते देखील चीनने दिलेले होते. या चार दिवसांच्या लढाईत पाकिस्तानच नाही तर चीन आणि तुर्कीची देखील पुरती नाचक्की भारताने करून टाकली होती. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान