शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

महागाईचा आगडोंब! पाकिस्तानात टोमॅटो 500 आणि कांदा 400 रुपये किलो; भारताकडे मागणार मदत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 11:07 IST

Pakistan Inflation : आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले होते. त्यानंतर आता भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहत.

श्रीलंकेनंतर पाकिस्तानलामहागाईचा सामना करावा लागत आहे. आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले होते. त्यानंतर आता भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहत. लाइव्हमिंटनुसार, लाहोर, इस्लामाबादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर आता पाकिस्तान सरकार भारतातून कांदा-टोमॅटो आयात करण्याचा विचार करत आहे. पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, वापराच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच किरकोळ बाजारात फळे आणि भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटोचा भाव 500 रुपये किलो तर कांद्याचा भाव 400 रुपयांवर पोहोचला होता. लाहोरमधील घाऊक व्यापारी सांगतात की काही ठिकाणी घाऊक किंमती 100 रुपयांच्या आसपास आहेत, पण किरकोळ बाजारात जाताना त्याची किंमत चार-पाच पटीने वाढते. ते म्हणाले की, बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधील पूरस्थितीमुळे भाजीपाला उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून येत्या काही दिवसांत भाजीपाल्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

700 रुपये किलोपर्यंत पोहोचेल किंमत 

घाऊक व्यापारी जवाद रिझवी यांचे म्हणणे आहे की, गंभीर पूरस्थिती आणि घसरलेले उत्पादन पाहता, लवकरच ठोस पावले उचलली नाहीत, तर टोमॅटो आणि कांद्याचे भाव येथे 700 रुपये किलोपर्यंत पोहोचतील. जीवनावश्यक भाज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बटाट्याचे दरही 40 रुपयांवरून 120 रुपये किलो झाले आहेत.

बाघा बॉर्डरवरून मागवला जाईल कांदा-टोमॅटो 

सध्या अफगाणिस्तानातून लाहोर आणि पंजाबच्या इतर शहरांमध्ये तोरखाम सीमेवरून कांदा आणि टोमॅटो येतात, मात्र अपुरा पुरवठा झाल्यामुळे पाकिस्तान सरकार आता भारतातून आयात करण्याची तयारी करत आहे, ती बाघा सीमेवरून केली जाणार आहे. लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनी सांगितले की, तोरखाम सीमेवरून दररोज 100 कंटेनर टोमॅटो आणि 30 कंटेनर कांद्याची खरेदी केली जाते. यातील दोन टोमॅटो आणि एक कांदा लाहोर शहरात पाठवला जातो, जो मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा आहे.

पाकिस्तान सध्या अफगाणिस्तानमधून कांदा-टोमॅटो आयात करत आहे, जे त्याच्या वापरापेक्षा खूपच कमी आहे. पाकिस्तानकडेही इराणमधून भाजीपाला आयात करण्याचा पर्याय आहे, मात्र हे काम ताफ्तान सीमेवरून करावे लागणार असून इराण सरकारने आयात-निर्यात कर वाढवला आहे. म्हणजेच आधीच भीषण महागाईने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला येथून आयात करणे महाग होणार आहे. अशा स्थितीत भारत हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे दिसते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInflationमहागाई