शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा, जाळपोळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:14 IST

pakistan economic crisis : पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट (Pakistan Economic Crisis) झाली आहे. येथील ढासळत्या आर्थिक परिस्थितीबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. महागाईने होरपळलेली जनता कधी पिठासाठी भांडताना दिसून येते, तर कधी पेट्रोलच्या किमती (Petrol Price in Pakistan) वाढल्यामुळे आक्रोश करताना दिसते. 

दरम्यान, वाढत्या महागाईदरम्यान पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील महागाई आणि कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे सरकार आणि जनता प्रचंड अस्वस्थ आहे. तिजोरी भरण्यासाठी शाहबाज सरकार जनतेवर कराचा बोजा वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 रुपयांनी वाढ केली असून या निर्णयामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

जाळपोळ केल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल एका पाकिस्तानी नागरिकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संतप्त जमावाने पेट्रोल पंप पेटवताना दिसत आहे. या यूजरने सांगितले की, देशात पेट्रोलच्या दरात 35 रुपयांची वाढ झाल्याने लोक संतप्त झाले असून त्यांनी लाहोरमध्ये एका पंपाला आग लावली. या घटनेनंतर पंपातून धुराचे लोट दूरवरून दिसत होते.

वाढत्या महागाईमुळे लोक हैराण दरम्यान, पाकिस्तानमधील वाढत्या महागाईमुळे येथील लोक हैराण झाले आहेत. पेट्रोल ते पीठाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानातील शहरांमध्ये कांद्याचा भाव प्रतिकिलो 220.4 रुपये, दुधाचा भाव 114.8 रुपये प्रति लिटरवरून 149.7 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर पीठ 150 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. तसेच, मोहरीचा भाव पाचशे रुपयांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल 249.80 रुपये प्रति लीटर, हाय-स्पीड डिझेल 262.80  रुपये प्रति लिटर, रॉकेल 189.83 रुपये आणि हलके डिझेल 187 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

श्रीलंकेत सुद्धा आर्थिक परिस्थिती होती बिकट श्रीलंकेत गेल्यावर्षी महागाई आणि हिंसाचाराने थैमान माजवले होते. आर्थिक संकटात सापडल्यानंतर श्रीलंकेत भीषण स्थिती निर्माण झाली होती. यानंतर हजारो निदर्शकांनी थेट तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. निदर्शकांवर अमानुषपणे लाठ्या चालवण्यात आल्या. या घटनेनंतर असंतोष आणखीच वाढताना दिसल्यानंतर पुढील धोका लक्षात घेत तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरल