शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मोदी सरकारचा निर्णय अवलंबण्याचा पाकिस्तानी अर्थतज्ज्ञांचा सल्ला, करावी लागेल ‘ही’ मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:28 IST

पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांकडे मदतही मागत आहे.

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा (Pakistan Economic Crisis) सामना करत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांकडे मदतही मागत आहे. परंतु आतापर्यंत चीनशिवाय पाकिस्तानला कोणत्याही देशानं मदतीचा हात पुढे केलेला नाही. परंतु आता एका पाकिस्तानी अर्थतज्ज्ञानं (Pakistani Economist) देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मोठा सल्ला दिला आहे. पाकिस्तान सरकारनं ५००० रुपयांची नोट तात्काळ बंद करावी (Demonetize 5000 Rupee Note) असं त्यांनी सूचवलं आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी आपली बुडती अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाकिस्ताननं त्वरित ५ हजार रूपयांच्या नोटांचा वापर बंद करण्याचा सल्ला दिला आहे. खान यांच्या पॉडकास्टचा काही भाग व्हायरल होत आहे. भारताच्या या सूत्रानं जबरदस्त कामगिरी केली आहे. यामुळे त्यांच्या कर संकलनातही वाढ झाली असल्याचं ते यात म्हणाले. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतानं ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता.

सर्क्युलेशनमध्ये ८ लाख कोटी“पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत कोणत्याही तपासाशिवाय तब्बल ८ लाख कोटी रूपये सर्क्युलेशनमध्ये आहेत. यामुळे रोख रकमेचा वापर वाढत आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा करही मिळत नाही. हाच पैसा आर्थिक संकाटाचा सामना करत असलेल्या देशातील महागाई आणखी वाढवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तानमध्ये बहुतांश व्यवहार रोख रकमेद्वारे केले जातात. अमेरिकन डॉलर्सच्या मदतीनं आयात केली जाते. अशातच त्याचा कोणताही हिशोब राहत नाही,” असं अम्मार खान म्हणाले.

…तर मदत होईल“या ५ हजार रुपयांच्या नोटांचा कोणताही उपयोग होत नाही. देशातील बँकांमध्ये रोखीची समस्या आहे आणि त्यामुळे त्या कर्ज देण्यास सक्षम नाहीत. ५ रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून जर ८ लाख कोटी रूपये बँकांकडे परत आले तर तुमच्याकडे सरप्लस पैसे उपलब्ध होती. जे आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत करतील,” असंही ते म्हणाले.

५ हजार रुपयांच्या नोट पाकिस्तानात बंद करण्याची आवश्यकता आहे. याचा विरोधही केला जाईल. परंतु या नोटा सामान्यपणे धनवान लोकांकडेच आहेत. त्यामुळे सामान्यांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही, असंही खान म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था