शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मोदी सरकारचा निर्णय अवलंबण्याचा पाकिस्तानी अर्थतज्ज्ञांचा सल्ला, करावी लागेल ‘ही’ मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:28 IST

पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांकडे मदतही मागत आहे.

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा (Pakistan Economic Crisis) सामना करत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांकडे मदतही मागत आहे. परंतु आतापर्यंत चीनशिवाय पाकिस्तानला कोणत्याही देशानं मदतीचा हात पुढे केलेला नाही. परंतु आता एका पाकिस्तानी अर्थतज्ज्ञानं (Pakistani Economist) देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मोठा सल्ला दिला आहे. पाकिस्तान सरकारनं ५००० रुपयांची नोट तात्काळ बंद करावी (Demonetize 5000 Rupee Note) असं त्यांनी सूचवलं आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी आपली बुडती अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाकिस्ताननं त्वरित ५ हजार रूपयांच्या नोटांचा वापर बंद करण्याचा सल्ला दिला आहे. खान यांच्या पॉडकास्टचा काही भाग व्हायरल होत आहे. भारताच्या या सूत्रानं जबरदस्त कामगिरी केली आहे. यामुळे त्यांच्या कर संकलनातही वाढ झाली असल्याचं ते यात म्हणाले. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतानं ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता.

सर्क्युलेशनमध्ये ८ लाख कोटी“पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत कोणत्याही तपासाशिवाय तब्बल ८ लाख कोटी रूपये सर्क्युलेशनमध्ये आहेत. यामुळे रोख रकमेचा वापर वाढत आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा करही मिळत नाही. हाच पैसा आर्थिक संकाटाचा सामना करत असलेल्या देशातील महागाई आणखी वाढवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तानमध्ये बहुतांश व्यवहार रोख रकमेद्वारे केले जातात. अमेरिकन डॉलर्सच्या मदतीनं आयात केली जाते. अशातच त्याचा कोणताही हिशोब राहत नाही,” असं अम्मार खान म्हणाले.

…तर मदत होईल“या ५ हजार रुपयांच्या नोटांचा कोणताही उपयोग होत नाही. देशातील बँकांमध्ये रोखीची समस्या आहे आणि त्यामुळे त्या कर्ज देण्यास सक्षम नाहीत. ५ रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून जर ८ लाख कोटी रूपये बँकांकडे परत आले तर तुमच्याकडे सरप्लस पैसे उपलब्ध होती. जे आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत करतील,” असंही ते म्हणाले.

५ हजार रुपयांच्या नोट पाकिस्तानात बंद करण्याची आवश्यकता आहे. याचा विरोधही केला जाईल. परंतु या नोटा सामान्यपणे धनवान लोकांकडेच आहेत. त्यामुळे सामान्यांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही, असंही खान म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था