शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

Pakistan Army Chief: ‘बिनकामाचे टँक, भारताशी युद्ध करू शकत नाही;’ बाजवांच्या वक्तव्यानंतर पाकवर नामुष्की, आता यु-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 13:03 IST

बाजवा यांनी पाकिस्तानी लष्कराची हतबलता आणि रणगाड्यांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

Pakistan Army Chief : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानी लष्कराची हतबलता आणि रणगाडय़ांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये आता बाजवा यांच्या कोर्ट मार्शलची मागणी जोर धरत असतानाच पाकिस्तानी लष्करानं या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. बाजवा यांचे अनौपचारिक विधान चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलंय, असे पाकिस्तानी लष्करानं सांगितलं. पाकिस्तान सर्व प्रकारे युद्धासाठी सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला.

पाकिस्तानी लष्कराच्या आयएसपीआरनं असंही म्हटलं आहे की पाकिस्तानी लष्करानं आपली शस्त्रं, उपकरणं आणि सैनिकांना अशा प्रकारे तयार केलं आहे आहेत की ते पाकिस्तानचं रक्षण करू शकतील आणि ते पुढेही करत राहतील. पाकिस्तानी लष्करानं हे स्पष्टीकरण अशावेळी दिलं आहे, जेव्हा जनरल बाजवा यांनी रणगाड्यांच्या दुरवस्थेबाबत केलेले वक्तव्य प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांच्यापुढे आल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. हमीद मीर यांनी एक टीव्ही पत्रकार नसीम जेहरा यांच्यासोबत एका कार्यक्रमात बाजवा यांच्याबद्दल मोठा खुलासा केला होता.

मीर यांनी केला होता खुलासापाकिस्तानमधील परिचित पत्रकार हामिद मीर यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील खुलासा केलाय. “बाजवांनी भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यासाठी भारताचे एनएसए अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली होती,” असं त्यांनी सांगितलं. ब्रिटन स्थित पाकिस्तानी मीडिया युके ४४ ला मीर यांनी दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. भारताविरोधात लढण्यासाटी पाकिस्तानी लष्कराकडे ना तर दारुगोळा आहे ना टँकमध्ये भरण्यासाठी डिझेल असल्याचं बाजवांनी काही ज्येष्ठ पत्रकारांना सांगितल्याचं मीर म्हणाले.

टँकसाठी डिझेलच नाही“कमांडर्सच्या मीटिंगमध्ये बाजवांनी सांगितलं होतं की पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराचा सामना करू शकत नाही. टँकसाठी आमच्याकडे डिझेलही नाही,” असं बाजवा म्हणाले असल्याचं मीर यांनी नमूद केलं. बाजवा यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तसंच काश्मीर प्रकरणीही तोडगा शोधण्यावर ते काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “बाजवांनी २०२१ मध्ये खुलासा केला होता की त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत चर्चा केली होती. तसंच सिझफायरच्या घोषणेनंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याची योजना आखली होती. काश्मीरबाबतही बाजवांनी एक तोडगा काढला होता. त्याबाबत त्यांनी पाकिस्तानी जनतेला कधीही सांगितलं नाही,” असा दावा मीर यांनी केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान