शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Army Chief: ‘बिनकामाचे टँक, भारताशी युद्ध करू शकत नाही;’ बाजवांच्या वक्तव्यानंतर पाकवर नामुष्की, आता यु-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 13:03 IST

बाजवा यांनी पाकिस्तानी लष्कराची हतबलता आणि रणगाड्यांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

Pakistan Army Chief : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानी लष्कराची हतबलता आणि रणगाडय़ांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये आता बाजवा यांच्या कोर्ट मार्शलची मागणी जोर धरत असतानाच पाकिस्तानी लष्करानं या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. बाजवा यांचे अनौपचारिक विधान चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलंय, असे पाकिस्तानी लष्करानं सांगितलं. पाकिस्तान सर्व प्रकारे युद्धासाठी सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला.

पाकिस्तानी लष्कराच्या आयएसपीआरनं असंही म्हटलं आहे की पाकिस्तानी लष्करानं आपली शस्त्रं, उपकरणं आणि सैनिकांना अशा प्रकारे तयार केलं आहे आहेत की ते पाकिस्तानचं रक्षण करू शकतील आणि ते पुढेही करत राहतील. पाकिस्तानी लष्करानं हे स्पष्टीकरण अशावेळी दिलं आहे, जेव्हा जनरल बाजवा यांनी रणगाड्यांच्या दुरवस्थेबाबत केलेले वक्तव्य प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांच्यापुढे आल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. हमीद मीर यांनी एक टीव्ही पत्रकार नसीम जेहरा यांच्यासोबत एका कार्यक्रमात बाजवा यांच्याबद्दल मोठा खुलासा केला होता.

मीर यांनी केला होता खुलासापाकिस्तानमधील परिचित पत्रकार हामिद मीर यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील खुलासा केलाय. “बाजवांनी भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यासाठी भारताचे एनएसए अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली होती,” असं त्यांनी सांगितलं. ब्रिटन स्थित पाकिस्तानी मीडिया युके ४४ ला मीर यांनी दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. भारताविरोधात लढण्यासाटी पाकिस्तानी लष्कराकडे ना तर दारुगोळा आहे ना टँकमध्ये भरण्यासाठी डिझेल असल्याचं बाजवांनी काही ज्येष्ठ पत्रकारांना सांगितल्याचं मीर म्हणाले.

टँकसाठी डिझेलच नाही“कमांडर्सच्या मीटिंगमध्ये बाजवांनी सांगितलं होतं की पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराचा सामना करू शकत नाही. टँकसाठी आमच्याकडे डिझेलही नाही,” असं बाजवा म्हणाले असल्याचं मीर यांनी नमूद केलं. बाजवा यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तसंच काश्मीर प्रकरणीही तोडगा शोधण्यावर ते काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “बाजवांनी २०२१ मध्ये खुलासा केला होता की त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत चर्चा केली होती. तसंच सिझफायरच्या घोषणेनंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याची योजना आखली होती. काश्मीरबाबतही बाजवांनी एक तोडगा काढला होता. त्याबाबत त्यांनी पाकिस्तानी जनतेला कधीही सांगितलं नाही,” असा दावा मीर यांनी केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान