शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

Pakistan Army Chief: ‘बिनकामाचे टँक, भारताशी युद्ध करू शकत नाही;’ बाजवांच्या वक्तव्यानंतर पाकवर नामुष्की, आता यु-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 13:03 IST

बाजवा यांनी पाकिस्तानी लष्कराची हतबलता आणि रणगाड्यांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

Pakistan Army Chief : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानी लष्कराची हतबलता आणि रणगाडय़ांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये आता बाजवा यांच्या कोर्ट मार्शलची मागणी जोर धरत असतानाच पाकिस्तानी लष्करानं या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. बाजवा यांचे अनौपचारिक विधान चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलंय, असे पाकिस्तानी लष्करानं सांगितलं. पाकिस्तान सर्व प्रकारे युद्धासाठी सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला.

पाकिस्तानी लष्कराच्या आयएसपीआरनं असंही म्हटलं आहे की पाकिस्तानी लष्करानं आपली शस्त्रं, उपकरणं आणि सैनिकांना अशा प्रकारे तयार केलं आहे आहेत की ते पाकिस्तानचं रक्षण करू शकतील आणि ते पुढेही करत राहतील. पाकिस्तानी लष्करानं हे स्पष्टीकरण अशावेळी दिलं आहे, जेव्हा जनरल बाजवा यांनी रणगाड्यांच्या दुरवस्थेबाबत केलेले वक्तव्य प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांच्यापुढे आल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. हमीद मीर यांनी एक टीव्ही पत्रकार नसीम जेहरा यांच्यासोबत एका कार्यक्रमात बाजवा यांच्याबद्दल मोठा खुलासा केला होता.

मीर यांनी केला होता खुलासापाकिस्तानमधील परिचित पत्रकार हामिद मीर यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील खुलासा केलाय. “बाजवांनी भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यासाठी भारताचे एनएसए अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली होती,” असं त्यांनी सांगितलं. ब्रिटन स्थित पाकिस्तानी मीडिया युके ४४ ला मीर यांनी दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. भारताविरोधात लढण्यासाटी पाकिस्तानी लष्कराकडे ना तर दारुगोळा आहे ना टँकमध्ये भरण्यासाठी डिझेल असल्याचं बाजवांनी काही ज्येष्ठ पत्रकारांना सांगितल्याचं मीर म्हणाले.

टँकसाठी डिझेलच नाही“कमांडर्सच्या मीटिंगमध्ये बाजवांनी सांगितलं होतं की पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराचा सामना करू शकत नाही. टँकसाठी आमच्याकडे डिझेलही नाही,” असं बाजवा म्हणाले असल्याचं मीर यांनी नमूद केलं. बाजवा यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तसंच काश्मीर प्रकरणीही तोडगा शोधण्यावर ते काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “बाजवांनी २०२१ मध्ये खुलासा केला होता की त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत चर्चा केली होती. तसंच सिझफायरच्या घोषणेनंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याची योजना आखली होती. काश्मीरबाबतही बाजवांनी एक तोडगा काढला होता. त्याबाबत त्यांनी पाकिस्तानी जनतेला कधीही सांगितलं नाही,” असा दावा मीर यांनी केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान