शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाकने काश्मिरींना चिथवावे -मुशर्रफ

By admin | Updated: October 17, 2014 10:42 IST

पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध पुन्हा गरळ ओकली असून काश्मिरात लढत असलेल्यांना पाकने चिथावणी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध पुन्हा गरळ ओकली असून  काश्मिरात लढत असलेल्यांना पाकने चिथावणी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
पाक लष्कराशिवाय काश्मिरात आमचा आणखी एक स्रोत असून तो म्हणजे भारताविरुद्ध लढणारे तेथील लोक. आम्ही त्यांना केवळ चिथावणी देण्याची गरज आहे, असे मुशर्रफ म्हणाले.
देशद्रोहाच्या खटल्यामध्ये सध्या जामिनावर असलेले मुशर्रफ एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
लष्कर भारतासोबत युद्ध करण्यास तयार असून पाकमधील एक लाख लोकदेखील काश्मीरसाठी लढू इच्छितात. पाक प्रत्युत्तर देऊच शकणार नसल्याच्या भ्रमात भारताने राहू नये, असे मुशर्रफ म्हणाले.
१९९९ मध्ये कारगिल संघर्षानंतर लगेचच मुशर्रफ यांनी पाकची सत्ता हस्तगत केली होती. काश्मिरात आम्ही भारतीय लष्कराशी समोरून तद्वतच मागून अशा दोन्ही बाजूंनी लढू शकतो, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 
 
सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाबाबत छेडले असता ते म्हणाले की, आम्ही एका गालावर चापट मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करणार्‍यांपैकी नाही. आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकतो. एखादा देश आतून कमकुवत असेल तरच बाह्य आक्रमण होऊ शकते. आपण अंतर्गतरीत्या मजबूत राहिलो तर आपल्याशी खेटण्याची कोणीही हिंमत करू शकणार नाही. मोदी हे मुस्लिम आणि पाकिस्तानविरोधी आहेत. त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही. आपली समस्या ही आहे की, आम्ही त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतो. आम्ही आपली प्रतिष्ठा जपायला हवी. (वृत्तसंस्था)