शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

"आमची संस्कृती धोक्यात..."; युरोपातील 'या' देशात बांगलादेशींमुळे वाद, क्रिकेटवर बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 20:56 IST

...आता अशाच काही बांगलादेशींमुळे एका अत्यंत आधुनिक युरोपीय देशात समस्या निर्माण झाली आहे.

बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनांमुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडण्याची वेळ आली. यानंतर हा देश आता मवाल्यांचा अड्डा बनला आहे. येथे झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये जवळपास एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या निदर्शनांमागे बांगलादेशी कट्टरपंथी लोकांचा हात होता. हे कट्टरपंथी भारतविरोधी असून त्यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. यांच्यामुळेच हा एक चांगली प्रगती करत असलेला देश उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. 

आता अशाच काही बांगलादेशींमुळे एका अत्यंत आधुनिक युरोपीय देशात समस्या निर्माण झाली आहे. या देशाचे नाव आहे इटली. येथील मॉनफाल्कोन (Monfalcone) या छोट्या शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे बांगलादेशी मुस्लीम मजूरांची संख्या लक्षणीय आहे. हे मजूर मोठमोठी जहाजे बनवणाऱ्या एका कंपनीत काम करतात.

या बांगलादेशी लोकांमुळे मॉनफाल्कॉन उद्ध्वस्त होत असल्याचे बोलले जात आहे. हे एक अत्यंत सुंदर शहर आहे. येथील लोक अतिशय आधुनिक आहेत. मात्र, येथील महापौर ॲना मारिया सिसिंट यांचे म्हणणे आहे की, बाहेरील लोकांमुळे आमची ओळख नष्ट होत आहे. आमची संस्कृती धोक्यात आली आहे. महापौर मारिया या उजव्या विचारसरणीच्या पक्षाशी संबंधित आहेत.

शहराची लोकसंख्या केवळ 30 हजार -खरे तर हे एक अत्यंत छोटे शहर आहे. येथील लोकसंख्या केवळ 30 हजार एवढीच आहे. येथे 1990 च्या दशकापासून बांगलादेशी मुस्लीम कामगार येत आहेत. येथे फिनकँटियरी ही जहाज तयार करणारी सरकारी कंपनीही आहे. येथील लोकसंख्येत एकतृतियांश परदेशी मजूर आहेत.

क्रिकेटवर बंदी - बीबीसीसोबत बोलताना महापौर मारिया म्हणाल्या, परदेशी मजुरांमुळे आणची संस्कृती थोक्यात आली आहे. येथे राहणारे बांगलादेशी लोक क्रिकेट खेळतात. अशा परिस्थितीत येथे क्रिकेटवरही बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी आपल्याकडे निधी नसल्याचेही मारिया यांनी म्हटले आहे. तसेच क्रिकेटचा चेंडू अत्यंत धोकादायक असतो. यामुळे या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, येथे कोणी क्रिकेट खेळताना आढळल्यास त्याला 111 डॉलर्सचा दंड भरावा लागेल.

एवढेच नाही तर, बांगलादेशी मुस्लीम लोक इटालियन लोकांमध्ये मिसळण्यास लायक नाहीत. हे लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. यामुळे शहराची ओळख नष्ट होत चालली आहे, असेही मारिया यांनी म्हटले आहे.

टॅग्स :ItalyइटलीMuslimमुस्लीमBangladeshबांगलादेश