शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

"आमची संस्कृती धोक्यात..."; युरोपातील 'या' देशात बांगलादेशींमुळे वाद, क्रिकेटवर बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 20:56 IST

...आता अशाच काही बांगलादेशींमुळे एका अत्यंत आधुनिक युरोपीय देशात समस्या निर्माण झाली आहे.

बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनांमुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडण्याची वेळ आली. यानंतर हा देश आता मवाल्यांचा अड्डा बनला आहे. येथे झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये जवळपास एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या निदर्शनांमागे बांगलादेशी कट्टरपंथी लोकांचा हात होता. हे कट्टरपंथी भारतविरोधी असून त्यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. यांच्यामुळेच हा एक चांगली प्रगती करत असलेला देश उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. 

आता अशाच काही बांगलादेशींमुळे एका अत्यंत आधुनिक युरोपीय देशात समस्या निर्माण झाली आहे. या देशाचे नाव आहे इटली. येथील मॉनफाल्कोन (Monfalcone) या छोट्या शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे बांगलादेशी मुस्लीम मजूरांची संख्या लक्षणीय आहे. हे मजूर मोठमोठी जहाजे बनवणाऱ्या एका कंपनीत काम करतात.

या बांगलादेशी लोकांमुळे मॉनफाल्कॉन उद्ध्वस्त होत असल्याचे बोलले जात आहे. हे एक अत्यंत सुंदर शहर आहे. येथील लोक अतिशय आधुनिक आहेत. मात्र, येथील महापौर ॲना मारिया सिसिंट यांचे म्हणणे आहे की, बाहेरील लोकांमुळे आमची ओळख नष्ट होत आहे. आमची संस्कृती धोक्यात आली आहे. महापौर मारिया या उजव्या विचारसरणीच्या पक्षाशी संबंधित आहेत.

शहराची लोकसंख्या केवळ 30 हजार -खरे तर हे एक अत्यंत छोटे शहर आहे. येथील लोकसंख्या केवळ 30 हजार एवढीच आहे. येथे 1990 च्या दशकापासून बांगलादेशी मुस्लीम कामगार येत आहेत. येथे फिनकँटियरी ही जहाज तयार करणारी सरकारी कंपनीही आहे. येथील लोकसंख्येत एकतृतियांश परदेशी मजूर आहेत.

क्रिकेटवर बंदी - बीबीसीसोबत बोलताना महापौर मारिया म्हणाल्या, परदेशी मजुरांमुळे आणची संस्कृती थोक्यात आली आहे. येथे राहणारे बांगलादेशी लोक क्रिकेट खेळतात. अशा परिस्थितीत येथे क्रिकेटवरही बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी आपल्याकडे निधी नसल्याचेही मारिया यांनी म्हटले आहे. तसेच क्रिकेटचा चेंडू अत्यंत धोकादायक असतो. यामुळे या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, येथे कोणी क्रिकेट खेळताना आढळल्यास त्याला 111 डॉलर्सचा दंड भरावा लागेल.

एवढेच नाही तर, बांगलादेशी मुस्लीम लोक इटालियन लोकांमध्ये मिसळण्यास लायक नाहीत. हे लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. यामुळे शहराची ओळख नष्ट होत चालली आहे, असेही मारिया यांनी म्हटले आहे.

टॅग्स :ItalyइटलीMuslimमुस्लीमBangladeshबांगलादेश