शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 04:56 IST

Operation Sindoor भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य, चारही प्रांतांचे मुख्यमंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इस्लामाबाद : भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाण व पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने बुधवारी घेतला. भारताने केलेल्या हल्ल्यात आमच्या निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य, चारही प्रांतांचे मुख्यमंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यातील कलम ५१ नुसार पाकिस्तानला स्वसंरक्षण करण्यासाठी प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असून तो आम्ही बजावणार आहोत. भारताने पाकिस्तानवर तसेच महिला व मुलांवर हल्ले केले असून ही लाजिरवाणी बाब असल्याचा दावा पाकिस्तानने केला. दहशतवादी तळांवर हल्ला केला हा भारताचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात त्या देशाने नागरी वस्त्यांवर हल्ले केल्याने पाकिस्तानातील पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

गंभीर परिणामांचा इशारापाकिस्तानने असाही कांगावा सुरू केला आहे की, भारताच्या या हल्ल्यामुळे आखाती देशांच्या विमानांना धोका निर्माण झाला आहे.  तसेच नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्पालाही भारताने लक्ष्य केले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवान