शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

OMG! देशाची लोकसंख्या २९ कोटींनी घटणार; जगभरातील घसरण कोणीही थांबवू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:40 IST

भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे.

वाढती लोकसंख्या जगासाठी आज मोठे संकट बनली आहे. परंतू, वॉशिंग्टन यूनिवर्सिटीने एक धक्कादायक अहवाल दिला आहे. भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. परंतू त्यानंतर जी लोकसंख्या घसरेल ती घसरण कोणीही कधीच थांबवू शकणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे. 

जगाची लोकसंख्या 2100 पर्यंत कमी होत जाणार आहे. 2064 मध्ये ही लोकसंख्या 9.7 अब्ज एवढी असेल. परंतू, पुढची ३६ वर्षे अशी जातील की ही लोकसंख्या 8.79 अब्जांवर येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे. यानुसार एकट्या भारतात २९ कोटींनी लोक कमी होणार आहेत. 

सर्वाधिक टेन्शन तर चीनला आहे. चीनची लोकसंख्या आता वृद्धापकाळाकडे जाऊ लागली आहे. २१०० मध्ये चीनची लोकसंख्या जवळपास निम्म्याने कमी होईल, असा अंदाज आहे. सध्या चीनमध्ये १४० कोटी लोक राहतात. त्यामध्ये 66.8 कोटींची घट होईल आणि लोकसंख्या 74 कोटींवर येईल. लोकसंख्या घसरणीचा जो ट्रेंड सुरु होईल तो कधीही बदलता येणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे. 

कुठे कुठे लोकसंख्या वाढणार....युरोपसह आशिया आणि दक्षिण अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल. परंतू आफ्रिकेमध्ये लोकसंख्या वाढणार आहे, मात्र, त्याचा वेग कमी असेल. नायजेरियामध्ये 58 कोटींनी लोकसंख्या वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

काय होता जन्मदर...लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी तज्ज्ञांनी शहरीकरण आणि महिलांच्या शिक्षणाला महत्व दिले आहे. याचबरोबर महिलांचे नोकरी करणे आणि गर्भनिरोधकांचा वापरही याला कारणीभूत आहे. १९६० मध्ये जगात एक महिला सरासरी 5.2 मुलांना जन्म देत होती. आज हा आकडा 2.4 मुले एवढा कमी झालेला आहे. 2100 पर्यंत हा सरासरी आकडा 1.66 मुले एवढाच होणार आहे.