शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

OMG! देशाची लोकसंख्या २९ कोटींनी घटणार; जगभरातील घसरण कोणीही थांबवू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:40 IST

भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे.

वाढती लोकसंख्या जगासाठी आज मोठे संकट बनली आहे. परंतू, वॉशिंग्टन यूनिवर्सिटीने एक धक्कादायक अहवाल दिला आहे. भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. परंतू त्यानंतर जी लोकसंख्या घसरेल ती घसरण कोणीही कधीच थांबवू शकणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे. 

जगाची लोकसंख्या 2100 पर्यंत कमी होत जाणार आहे. 2064 मध्ये ही लोकसंख्या 9.7 अब्ज एवढी असेल. परंतू, पुढची ३६ वर्षे अशी जातील की ही लोकसंख्या 8.79 अब्जांवर येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे. यानुसार एकट्या भारतात २९ कोटींनी लोक कमी होणार आहेत. 

सर्वाधिक टेन्शन तर चीनला आहे. चीनची लोकसंख्या आता वृद्धापकाळाकडे जाऊ लागली आहे. २१०० मध्ये चीनची लोकसंख्या जवळपास निम्म्याने कमी होईल, असा अंदाज आहे. सध्या चीनमध्ये १४० कोटी लोक राहतात. त्यामध्ये 66.8 कोटींची घट होईल आणि लोकसंख्या 74 कोटींवर येईल. लोकसंख्या घसरणीचा जो ट्रेंड सुरु होईल तो कधीही बदलता येणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे. 

कुठे कुठे लोकसंख्या वाढणार....युरोपसह आशिया आणि दक्षिण अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल. परंतू आफ्रिकेमध्ये लोकसंख्या वाढणार आहे, मात्र, त्याचा वेग कमी असेल. नायजेरियामध्ये 58 कोटींनी लोकसंख्या वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

काय होता जन्मदर...लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी तज्ज्ञांनी शहरीकरण आणि महिलांच्या शिक्षणाला महत्व दिले आहे. याचबरोबर महिलांचे नोकरी करणे आणि गर्भनिरोधकांचा वापरही याला कारणीभूत आहे. १९६० मध्ये जगात एक महिला सरासरी 5.2 मुलांना जन्म देत होती. आज हा आकडा 2.4 मुले एवढा कमी झालेला आहे. 2100 पर्यंत हा सरासरी आकडा 1.66 मुले एवढाच होणार आहे.