शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

OMG! देशाची लोकसंख्या २९ कोटींनी घटणार; जगभरातील घसरण कोणीही थांबवू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:40 IST

भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे.

वाढती लोकसंख्या जगासाठी आज मोठे संकट बनली आहे. परंतू, वॉशिंग्टन यूनिवर्सिटीने एक धक्कादायक अहवाल दिला आहे. भारतासह जगाची लोकसंख्या २०६४ मध्ये उच्चांकावर असणार आहे. परंतू त्यानंतर जी लोकसंख्या घसरेल ती घसरण कोणीही कधीच थांबवू शकणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे. 

जगाची लोकसंख्या 2100 पर्यंत कमी होत जाणार आहे. 2064 मध्ये ही लोकसंख्या 9.7 अब्ज एवढी असेल. परंतू, पुढची ३६ वर्षे अशी जातील की ही लोकसंख्या 8.79 अब्जांवर येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लैंसेट मेडिकल जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे. यानुसार एकट्या भारतात २९ कोटींनी लोक कमी होणार आहेत. 

सर्वाधिक टेन्शन तर चीनला आहे. चीनची लोकसंख्या आता वृद्धापकाळाकडे जाऊ लागली आहे. २१०० मध्ये चीनची लोकसंख्या जवळपास निम्म्याने कमी होईल, असा अंदाज आहे. सध्या चीनमध्ये १४० कोटी लोक राहतात. त्यामध्ये 66.8 कोटींची घट होईल आणि लोकसंख्या 74 कोटींवर येईल. लोकसंख्या घसरणीचा जो ट्रेंड सुरु होईल तो कधीही बदलता येणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे. 

कुठे कुठे लोकसंख्या वाढणार....युरोपसह आशिया आणि दक्षिण अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल. परंतू आफ्रिकेमध्ये लोकसंख्या वाढणार आहे, मात्र, त्याचा वेग कमी असेल. नायजेरियामध्ये 58 कोटींनी लोकसंख्या वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

काय होता जन्मदर...लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी तज्ज्ञांनी शहरीकरण आणि महिलांच्या शिक्षणाला महत्व दिले आहे. याचबरोबर महिलांचे नोकरी करणे आणि गर्भनिरोधकांचा वापरही याला कारणीभूत आहे. १९६० मध्ये जगात एक महिला सरासरी 5.2 मुलांना जन्म देत होती. आज हा आकडा 2.4 मुले एवढा कमी झालेला आहे. 2100 पर्यंत हा सरासरी आकडा 1.66 मुले एवढाच होणार आहे.