शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आता लक्ष्य २० हजार अब्ज डॉलरचे

By admin | Updated: September 28, 2015 02:58 IST

आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर दुसऱ्या संस्था म्हणतात की, जगामधील मोठ्या देशांमध्ये भारत सर्वात अधिक गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे

सिलिकॉन व्हॅली (अमेरिका) : आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर दुसऱ्या संस्था म्हणतात की, जगामधील मोठ्या देशांमध्ये भारत सर्वात अधिक गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था आठ हजार अब्ज डॉलरची आहे आणि आम्हाला ती २० हजार अब्ज डॉलरपर्यंत वाढवायची आहे. त्याकरिता आम्हाला कृषी, सेवा आणि रियल इस्टेटच्या क्षेत्रात लक्ष देण्याची गरज आहे, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सोशल मीडिया फेसबुक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘लाईव्ह चॅट’ कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, एनडीए सरकारचे सर्वात मोठे यश असे की, गेल्या १५ महिन्यांमध्ये भारताकडे पाहण्याचा विश्वाचा दृष्टिकोन बदलला आहे. आम्ही गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण केला आहे. प्रशासनात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे, ज्यामुळे पारदर्शकता, उपयुक्ततता आणि सहजपणे लोकांची कामे करता आली पाहिजे. त्याकरिता निधीची कमतरता नाही, कारण की अनेक देशांकडे अतिरिक्त पैसा उपलब्ध आहे. त्यांनी या निधीची भारतात गुंतवणूक करावी, असे मोदी यांनी आवाहन केले.मेक इन इंडियाबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले की, भारतासारख्या विस्तीर्ण देशामध्ये परिवर्तन येण्याकरिता वेळ लागत असतो. ४० वर्षांपूर्वी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्या माध्यमातून देशातील गरिबांना आर्थिक सोर्इंचा लाभ मिळावा, असा उद्देश होता. मात्र त्यानंतरही ६० टक्के लोकांकडे बँक खाते नव्हते. परंतु आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांमध्ये १४ कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली. मेक इन इंडियाचे यश हे प्रत्येक व्यक्ती स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छितो. जर हे काम भारतात कमी खर्चात होत असेल तर जगातील लोक तिकडे जातील. आमच्याकडे कुशल कारागीर आणि कच्चा माल आहे. हीच मेक इन इंडियाच्या यशाची हमी आहे.मोदी म्हणाले की, गेल्या १५ महिन्यांमध्ये भारतात अमेरिकतेतून ८७ टक्के एफडीआय वाढ झाली आहे. तसेच संस्थागत गुंतवणुकीतदेखील ४० टक्के वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये घसरण सुरू असताना भारतात ही स्थिती निर्माण झाली आहे. मेक इन इंडियाच्या यशस्वीतेकरिता आमच्याकडे तरुणांची शक्ती, सशक्त लोकशाही आणि मोठी ग्राहक संख्या आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.ते म्हणाले की, जेव्हा मी इंटरनेट सोशल मीडियाशी जोडल्या गेलो, त्यावेळी त्याच्या शक्तीबाबत अंदाज नव्हता. सत्तेवर आल्यानंतर सोशल मीडियामुळे कामे सहज शक्य होऊ लागली. सोशल मीडियाचे वैशिष्ट्य असे की, तुम्ही ज्या प्रकारचे आहात, त्याप्रमाणे तुमचा सोशल मीडिया स्वीकार करीत असतो. त्याकरिता तुम्हाला स्वत:मध्ये परिवर्तन घडविण्याची गरज नाही. सोशल मीडिया आजच्या घटकेला लोकशाहीचे सामर्थ्य बनला आहे. पूर्वी ज्या कामाकरिता अनेक दिवस लागत असत, ती कामे आता सेकंदामध्ये होऊ लागली आहेत.मोदी पुढे म्हणाले की, सोशल मीडियाने प्रशासनातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.