शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही.एस. नायपॉल कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:30 IST

नोबेल पुरस्कारविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल यांचे निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. नायपॉल यांच्या कुटुबीयांकडून शनिवारी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली

लंडन - नोबेल पुरस्कारविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल यांचे निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. नायपॉल यांच्या कुटुबीयांकडून शनिवारी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली. नायपॉल यांच्या कामगिरी महान असून त्यांनी शेवटच्या इच्छेप्रमाणे आपल्या प्रियजनांसमोरच अखेरचा श्वास घेतला, असे नायपॉल यांच्या पत्नीने म्हटले आहे. नायपॉल यांचे जीवनात अनेक आश्चर्यजनक बाबी घडल्या असून ते वळणावळाचे होते, असेही त्यांनी म्हटले.

विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांनी 30 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. सन 2001 साली त्यांना साहित्याचानोबेल पुरस्कार देण्यात आला. विद्याधर यांचा जन्म त्रिनिनाद येथे झाला होता, तर त्यांचे वडिल एक प्रशासकीय अधिकारी होते. 'अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास' ही त्यांच्या साहित्यातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांचे अर्धआत्मचरित्रच आहे. कॅरेबियाई देशांमध्ये आलेल्या भारतीय प्रवाशांचे वर्णन या पुस्तकात आहे. भारतीय प्रवाशांचा कॅरेबियाई देशात मिसळलेला आपलेपणा आणि तेथील संस्कृतीशी झालेला जिव्हाळा, याचे वर्णन या पुस्तकात आहे. 

कोण होते नायपॉल?

-नायपॉल यांचा जन्म त्रिनिनाद येथे १७ आॅगस्ट १९३२ रोजी एका भारतीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील सनदी अधिकारी होते. नायपॉल यांचे आजोबा मजूर म्हणून त्रिनिदाद येथे आले होते.-आॅक्सफर्ड येथील महाविद्यालयात इंग्रजी विषयात पदवीशिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप मिळाल्यानंतर वयाच्या १८ वर्षी ते इंग्लंडला रवाना झाले व पुढे त्याच देशात स्थायिक झाले.- नायपॉल हे पॅट्रिशिया अ‍ॅन हॅले हिच्याशी १९५५ साली विवाहबद्ध झाले. तिच्या मृत्यूनंतर त्यांनी १९९६ साली पाकिस्तानी पत्रकार नादिरा खानम अल्वी हिच्याशी दुसरा विवाह केला.

एक महान लेखक हरपलाइतिहास, संस्कृती, वसाहतवाद, राजकारण व अन्य विषयांचे सखोल दर्शन आपल्या साहित्यकृतींतून नायपॉल यांनी घडविले. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वातील एक महान लेखक हरपला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

वडीलबंधूला गमावलेसाहित्य, राजकारण अशा अनेक गोष्टींबद्दल आमचे मतभेद होते, पण त्यांच्या निधनाने वडीलबंधू गमावल्याचे दु:ख मला झाले आहे.- सलमान रश्दी,प्रख्यात लेखक

नायपॉल हे मनस्वी लेखक होते. - रामचंद्र गुहा, इतिहासकार

नायपॉल यांना कधीही भेटलो नाही मात्र त्यांच्या पुस्तकांचे अक्षरश: पारायण केले आहे. त्यांच्या लेखनाने केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. - सुकेतु मेहता, लेखक

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारliteratureसाहित्य