शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये नवीन धर्मनिरपेक्ष घटना लागू

By admin | Updated: September 20, 2015 22:36 IST

सुमारे सात वर्षे चाललेले चर्चेचे गुऱ्हाळ, देशातील तणाव, हिंसक निदर्शने या वातावरणातच रविवारी नेपाळने ऐतिहासिक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी घटना मंजूर केली.

काठमांडू : सुमारे सात वर्षे चाललेले चर्चेचे गुऱ्हाळ, देशातील तणाव, हिंसक निदर्शने या वातावरणातच रविवारी नेपाळने ऐतिहासिक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी घटना मंजूर केली. या नवीन घटनेनुसार नेपाळमध्ये सात संघराज्ये अस्तित्वात आली आहेत. या नवीन घटनेच्या विरोधात अल्पसंख्याक मधेशी गटांनी हिंसक आंदोलन चालविले होते.या नवीन घटनेतील तरतुदी अध्यक्ष राम बरन यादव यांनी संसदेत जाहीर केल्या. संविधान सभेने मंजूर केलेली आणि संविधान सभेच्या अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलेली नवीन घटना २० सप्टेंबर २०१५ पासूनच लागू झाल्याची घोषणा मी करीत आहे, असे अध्यक्ष राम बरन यादव यांनी जाहीर केले.ते म्हणाले की, या ऐतिहासिक क्षणी सर्वांच्या ऐक्याचे आणि सहकार्याचे आवाहन मी करतो. नया बानेश्वर स्थित संसद भवनात त्यांनी ही घोषणा केली. त्यावेळी भारताच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातील मधेशी समर्थक किरकोळ हिंसाचार करीत होते.एका हिंदू राष्ट्रातून धर्मनिरपेक्ष राष्ट्रात नेपाळचे परिवर्तन होत असताना हजारो नेपाळी नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी नेपाळचा राष्ट्रीय ध्वज उंचावत आनंदोत्सव साजरा केला. संसद भवनासमोरही मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. यानिमित्ताने काठमांडूच्या विविध भागांत मिरवणुका काढण्यात आल्या. अनेकांनी रस्त्याची सजावट आणि घरांवर रोषणाई केली.राम बरन यादव म्हणाले की, ही घटना म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची हमी देणारा दस्तऐवज आहे. त्यातून सार्वभौम नेपाळ अस्तित्वात आले आहे. या नवीन घटनेने नेपाळ हे पूर्णपणे लोकशाही राष्ट्र बनले आहे. या नवीन घटनेने देशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित होईल, असा मला विश्वास वाटतो. त्यातून देशाची आर्थिक प्रगती होऊन सुबत्ता येईल. कायमस्वरूपी शांततेसाठी जनतेने गेल्या सात दशकांपासून लढा दिला होता. या नवीन घटनेने त्यांना ऐक्य राखण्यास मदत केली आहे. देशात सात प्रांत निर्माण होत असल्याचा निषेध हिंसक स्वरूपात गेल्या महिन्यात झाला असून, त्यात किमान ४० जण ठार झाले.