शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नेताजींचा मृत्यू झाला विमान अपघातातच

By admin | Updated: September 9, 2016 04:38 IST

दुसऱ्या महायुद्धात जपानचे बॉम्बफेकी विमान तैवानमध्ये कोसळून १८ आॅगस्ट १९४५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होरपळून मृत्यू

लंडन : दुसऱ्या महायुद्धात जपानचे बॉम्बफेकी विमान तैवानमध्ये कोसळून १८ आॅगस्ट १९४५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होरपळून मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती असलेले जपान सरकारचे अधिकृत दस्तावेज येथील एका वेबसाइटने प्रसिद्ध केले आहेत.‘बोसफाइल्स.इन्फो’ या वेबसाइटने जपान सरकारने अमेरिकेस १९४५ मध्ये पाठविलेला अंतरिम अहवाल ताज्या दस्तावेजांमध्ये आहे. मित्र राष्ट्रांच्या फौजांचे भारत आणि जपानी लष्कराच्या योकोहोमा डिव्हिजनने नेताजींच्या मृत्यूनंतर दोन आठवड्यांत हा अहवाल लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांना पाठविला. अंतिम अहवाल १९५६ मध्ये पाठविला होता. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला, हे सिद्ध करण्यासाठी या वेबसाईटने बरीच माहिती प्रसिद्ध केली आहे. (वृत्तसंस्था)नेताजी बोस यांना घेऊन तौरेन (आताचे दा नांग) येथून निघालेले जपानी लष्कराचे बॉम्बफेकी विमान १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैहोकू विमानतळावर पोहोचले.इंधन भरून विमानाने पुन्हा उड्डाण केले. जेमतेम १० मीटर उंचीवर गेल्यावर डाव्या बाजूच्या इंजिनाचा प्रॉपेलर निखळून खाली पडल्याने विमान जोरात हेलहावे खाऊ लागले. विमानतळाच्या टोकावरील टेकाडावर आदळून विमानाच्या दोन्ही बाजूस आग लागली.इंधनाने माखलेले व आगीने लपेटलेले नेताजी विमानातून बाहेर आले व सरपटत पुढच्या बाजूस गेले. त्यांचे मदतनीस हबीब-उर-रहमान हेही खुरडत बाहेर पडले व त्यांनी नेताजींच्या कपड्यांना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला.नेताजींच्या मानेवर दोन-तीन ठिकाणी कापले होते. नेताजींना तैहोकू येथील लष्करी इस्तितळात नेऊन दु. ३वाजता उपचार सुरू झाले. मात्र रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. २० आॅगस्ट रोजी त्यांचे पार्थिव शवपेटिकेत ठेवण्यात आले. २२ आॅगस्टला ‘अंत्यविधी’ झाले व २३ आॅगस्ट रोजी तैहोकू येथील निशी होन्गांजी बौद्ध मंदिरात त्यांचे दफन करण्यात आले.