शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नेपाळ भूस्खलन, पुरातील बळींची संख्या ११५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:07 IST

नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे.

काठमांडू : नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे. तर सुमारे ४० लोक गायब आहेत. या पुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत.गेले ३ दिवस नेपाळला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, त्यामुळे पुराच्या व दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्या हजारो लोकांना तात्पुरता आश्रय मिळाला आहे. मात्र त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे ‘काठमांडू पोस्ट’ने म्हटले आहे. निर्मनुष्य भागातून सात मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत पुरामुळे ११५ जणांचा बळी गेला असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. ‘पुरामुळे किती नुकसान झाले, हे निश्चित करण्यासाठी गृहमंत्री जनार्दन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे,’ असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते राम कृष्ण सुबेदी यांनी सांगितले.नेपाळ सरकारने बचाव व मदत कार्याचा वेग वाढवला असून, आपत्तीनंतर मदतीसाठी २७ हजार सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले आहे. हरवलेल्यांना शोधण्याचे कार्यही सुरू असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले.१३ हेलिकॉप्टर (त्यात नेपाळ आर्मीच्या हेलिकॉप्टरचाही समावेश आहे) मोटारबोट, रबरबोट इत्यादींद्वारे नागरिकांना मदत पुरविण्यात येत आहे. नेपाळमधील बहुतांश भागातून वाहणाºया राप्ती नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे नेपाळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात अनेक विदेशी लोक अडकले आहेत. त्यात ३५ भारतीयांचा समावेश असल्याचे भारतीय दूतावासाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. या पुरामुळे नेपाळमधील २७ जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.