शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नेपाळ भूस्खलन, पुरातील बळींची संख्या ११५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:07 IST

नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे.

काठमांडू : नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे. तर सुमारे ४० लोक गायब आहेत. या पुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत.गेले ३ दिवस नेपाळला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, त्यामुळे पुराच्या व दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्या हजारो लोकांना तात्पुरता आश्रय मिळाला आहे. मात्र त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे ‘काठमांडू पोस्ट’ने म्हटले आहे. निर्मनुष्य भागातून सात मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत पुरामुळे ११५ जणांचा बळी गेला असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. ‘पुरामुळे किती नुकसान झाले, हे निश्चित करण्यासाठी गृहमंत्री जनार्दन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे,’ असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते राम कृष्ण सुबेदी यांनी सांगितले.नेपाळ सरकारने बचाव व मदत कार्याचा वेग वाढवला असून, आपत्तीनंतर मदतीसाठी २७ हजार सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले आहे. हरवलेल्यांना शोधण्याचे कार्यही सुरू असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले.१३ हेलिकॉप्टर (त्यात नेपाळ आर्मीच्या हेलिकॉप्टरचाही समावेश आहे) मोटारबोट, रबरबोट इत्यादींद्वारे नागरिकांना मदत पुरविण्यात येत आहे. नेपाळमधील बहुतांश भागातून वाहणाºया राप्ती नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे नेपाळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात अनेक विदेशी लोक अडकले आहेत. त्यात ३५ भारतीयांचा समावेश असल्याचे भारतीय दूतावासाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. या पुरामुळे नेपाळमधील २७ जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.