शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नेपाळ भूस्खलन, पुरातील बळींची संख्या ११५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:07 IST

नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे.

काठमांडू : नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे. तर सुमारे ४० लोक गायब आहेत. या पुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत.गेले ३ दिवस नेपाळला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, त्यामुळे पुराच्या व दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्या हजारो लोकांना तात्पुरता आश्रय मिळाला आहे. मात्र त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे ‘काठमांडू पोस्ट’ने म्हटले आहे. निर्मनुष्य भागातून सात मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत पुरामुळे ११५ जणांचा बळी गेला असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. ‘पुरामुळे किती नुकसान झाले, हे निश्चित करण्यासाठी गृहमंत्री जनार्दन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे,’ असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते राम कृष्ण सुबेदी यांनी सांगितले.नेपाळ सरकारने बचाव व मदत कार्याचा वेग वाढवला असून, आपत्तीनंतर मदतीसाठी २७ हजार सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले आहे. हरवलेल्यांना शोधण्याचे कार्यही सुरू असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले.१३ हेलिकॉप्टर (त्यात नेपाळ आर्मीच्या हेलिकॉप्टरचाही समावेश आहे) मोटारबोट, रबरबोट इत्यादींद्वारे नागरिकांना मदत पुरविण्यात येत आहे. नेपाळमधील बहुतांश भागातून वाहणाºया राप्ती नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे नेपाळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात अनेक विदेशी लोक अडकले आहेत. त्यात ३५ भारतीयांचा समावेश असल्याचे भारतीय दूतावासाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. या पुरामुळे नेपाळमधील २७ जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.