शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नेपाळ सरकारने भारतासह ३४ देशांची मदत मोहीम गुंडाळली ?

By admin | Updated: May 4, 2015 16:40 IST

नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर भारतासह ३४ देशांच्या जवानांनी राबवेली बचाव मोहीम थांबवण्याचे आदेश नेपाळ सरकारने दिल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत 

काठमांडू, दि. ४  -  नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर भारतासह ३४ देशांच्या जवानांनी राबवेली बचाव मोहीम थांबवण्याचे आदेश नेपाळ सरकारने दिल्याचे वृत्त आहे. याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी नेपाळमधील खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 

नेपाळमध्ये २५ एप्रिलरोजी विनाशकारी भूकंपाचा धक्का बसला व या भूकंपात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व प्राणहानी झाली आहे. आत्तापर्यंत सात हजारहून अधिक नागरिकांचा या भूकंपात मृत्यू झाला असून जखमींचा आकडाही १४ हजाराच्यावर पोहोचला आहे. नेपाळमध्ये बचाव व मदतकार्यासाठी भारतासह चीन, युके, नेदरलँड, जपात, तुर्किस्तान अशा ३४ देशांचे पथक तिथे दाखल झाले होते. भारताचे सैन्य, हवाई दलाचे जवानांसोबत एनडीआरएफच्या ५० जवानांच्या १६ तुकड्या तिथे मदतकार्य करत आहेत. पण आता नेपाळ सरकारने या सर्व देशांच्या पथकांना बचावकार्य गुंडाळण्याचे निर्देश दिले आहेत. आता ढिगा-याखालून जीवंत बाहेर पडणा-यांची शक्यता कमी असून बचावकार्याऐवजी आता मदतकार्यावर भर दिले जाईल असे नेपाळमधील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे.