शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

दक्षिण सुदानमध्ये ३०,००० नागरिक कुपोषणामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: October 23, 2015 03:50 IST

युद्धग्रस्त दक्षिण सुदानमध्ये तब्बल ३०,००० नागरिक कुपोषणामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर भीषण दुष्काळामुळे

नैरोबी : युद्धग्रस्त दक्षिण सुदानमध्ये तब्बल ३०,००० नागरिक कुपोषणामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर भीषण दुष्काळामुळे आणखी हजारो नागरिक याच मार्गावर आहेत, असेही म्हटले आहे.युद्धग्रस्त भागात अधिकृतरीत्या दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नसला तरी मागील २२ महिन्यांतील ही अत्यंत वाईट स्थिती आहे, असेही संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. युद्धाच्या स्थितीमुळे युद्धगुन्हे व इतर अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अन्नधान्य पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना, युनिसेफ व जागतिक अन्न कार्यक्रम यांनी संयुक्त अहवाल जारी करून या स्थितीची माहिती दिली आहे. युद्धस्थितीमुळे ज्या भागांना फटका बसला आहे, त्यात तेलाचे उत्पादन करण्यात अग्रेसर असलेल्या भागाचाही समावेश आहे; परंतु आता येथे सुरू असलेल्या जोरदार युद्धामुळे महिला व मुलांचे सामूहिक अपहरण, बलात्कार अशा घटना वाढल्या आहेत. यामुळे एकूण ३९ लाख लोक प्रभावित झाले असून ही लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश एवढी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आणखी ८० टक्के जास्त लोक प्रभावित झाले आहेत. एकूण लोकसंख्येच्या २० टक्के नागरिक जेव्हा भूकबळीच्या उंबरठ्यावर उभे असतात तेव्हा भीषण स्थितीचा इशारा दिला जातो. तेथील नागरिकांची व्यक्तिगत स्थितीही अत्यंत भीषण झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. युद्धजन्य भागात फारच कमी पाऊस झाल्यामुळे पीकस्थिती गंभीर आहे. तरीही दुष्काळाची स्थिती उद्भवण्यास हवामान नव्हे तर युद्धस्थिती कारणीभूत आहे, असे अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)अनेक भागांतील मदतकार्य बंद केलेलीर, गीट, कोच आणि मेंडिट या भागात मदतकार्य सुरू होते; परंतु जोरदार युद्ध सुरू असल्यामुळे हे मदतकार्य बंद करावे लागले. या भागातील दोन्ही बाजूंचे लोक वंशवादामुळे क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडत आहेत. आपल्या शत्रू समजल्या जाणाऱ्या वंशाची मुले, स्त्रिया यांची हत्या, छळ, अपहरण केले जात आहे. दुष्काळ जाहीर करणे ही फक्त एक तांत्रिक बाब आहे. येथे तातडीने मानवी मदत पोहोचली नाही तर स्थिती भीषण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.