शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

चंद्रावर 'नासा'ची स्वच्छता मोहीम, 50 वर्षापूर्वी केलेला कचरा पुन्हा आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 17:29 IST

चंद्रमोहिमेत अंतराळवीरांनी चंद्रावर केलेला कचरा पृथ्वीवर आणण्यासाठी 'नासा'ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 2024 पर्यंत नासाने चंद्रावरील कचरा पुन्हा पृथ्वीवर आणण्याचे ठरवले आहे.  

न्यूयॉर्क : 50 वर्षापूर्वी पहिल्यांदा माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. मानवी इतिहासातला तो ऐतिहासिक क्षण होता. त्यावेळी चंद्रावरून दगड आणि मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले होते. चंद्रमोहिमेत अंतराळवीरांनी चंद्रावर केलेला कचरा पृथ्वीवर आणण्यासाठी 'नासा'ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 2024 पर्यंत नासाने चंद्रावरील कचरा पुन्हा पृथ्वीवर आणण्याचे ठरवले आहे.  

नासाच्या या मोहिमेत एकूण 12 वैमाज्ञिक सहभागी झाले होते. मात्र या वैमाज्ञिकांना जवळपास 96 पिशव्या मानवी मल आणि इतर कचरा चंद्रावरच सोडून आले होते. मानवाने तिथे निर्माण केलेला कचरा पुन्हा आणून नासा संशोधन करणार आहे. चंद्रावर गेलेल्या स्पेसक्राफ्टमधून ठरावीक वजन वाहून नेण्याची क्षमता होती. मात्र चंद्रमोहिमेवरुन परत येताना आर्म्सस्ट्राँगची इच्छा नसतानाही जवळपास 100 वस्तू त्यांना चंद्रावर सोडाव्या लागल्या. ज्यामध्ये स्पेस, बूट्स, टूल्स आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे.  स्पेसक्राप्टमध्ये वजनापेक्षा अधिक सामान पुन्हा परतताना आणले असते तर अंतराळवीरांसाठी धोकादायक होतं. 'नासाकड़ून चंद्रावरची मोहीम लवकरात लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहे. अंतराळवीरांनी अवकाशात काहीच दिवस व्यतित केले होते. अंतराळवीरांना आपले मल-मुत्र अंतराळात सोडण्याची गरज भासू नये यासाठी ‘नासा’ने त्यांच्यासाठी खास पोषाख बनवले होते, ज्यामध्ये डायपरही होते. 

आर्म्सस्ट्राँगकडून सोडण्यात आलेल्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचं होतं ते चंद्रावरील दगड आणि माती त्याचसोबत आर्म्सस्ट्राँगकडून चंद्रावर अमेरिकेचा झेंडाही निशाण म्हणून ठेवण्यात आला होता. या घटनेला जवळपास 50 वर्ष पूर्ण होत आहे.  'नासा'चे शास्त्रज्ञ हा कचरा पुन्हा पृथ्वीवर आणून चंद्रावरील जीवनमानाचा शोध लावणार आहे

नासाला का परत आणायच्या आहेत बॅग्स?मानवी मलामधून चंद्रावरील जीवसृष्टीचा शोध नासाला घ्यायचा आहे. त्याचसोबत या मिशनसोबत अन्य काही गोष्टींचा उलगडाही होऊ शकतो अशी शक्यता नासाला वाटत आहे. कचर्‍याच्या पिशव्या कडक झाल्या तर त्यात बॅक्टेरिया आहेत यावर शिक्कामोर्तब होईल.जर बॅक्टेरिया मृत असतील तर त्यांच्या अभ्यास करणे महत्त्वपूर्ण ठरेल. कारण हे बॅक्टेरिया किती काळ जिवंत होते याचा शास्त्रज्ञ शोध लावू शकतील. मानवी मलमूत्रात आजही बॅक्टेरिया जिवंत आहेत का हे जाणून घेण्याची उत्सुकता शास्त्रज्ञांना आहे. 

टॅग्स :NASAनासाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न