शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

नरेंद्र मोदींनी वाजपेयींच्या मार्गाने जावं - खुर्शीद कसुरींची अपेक्षा

By admin | Updated: October 12, 2015 19:15 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा मार्ग योग्य होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हे ओळखायला हवं आणि त्याच मार्गाने जायला हवं अशी अपेक्षा पाकस्तानचे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा मार्ग योग्य होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हे ओळखायला हवं आणि त्याच मार्गाने जायला हवं अशी अपेक्षा पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी व्यक्त केली आहे.  भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी इतिहासाचं पार खोबरं केलेलं आहे असं सांगताना पुढचा प्रवास हा सहमतीने, चर्चेने करायला हवा असं कसुरी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये चांगल्या विचारांची बुद्धीमान माणसं आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं आणि त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांबाबत प्रत्येक गोष्टीवर देखरेख करावी असं सांगतानाच संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीपेक्षा ही माणसं जास्त चांगलं आणि सकारात्मक काम करतील असा प्रस्ताव कसुरी यांनी मांडला.
सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसुरींना व कार्यक्रमाला सुरक्षा पुरवणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं सांगितलं तर शिवसेनेचा विरोध कायम राहील आणि वेट अँड वॉच करा असं सांगत शिवसेनेच्या संजय राउत यांनी कार्यक्रम उधळण्याची शक्यता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरू झाला व कुठलाही अनुचित प्रकार न घडता पारही पडला. 
इतिहासासंबंधी असलेले गैरसमज सुधारणं हा पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे असं सांगणा-या कसुरींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- दोन्ही देशांतील तणावामुळे सामान्य नागरिक, जवान शहीद होत आहेत. इच्छा असेल तर या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेलच.
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विकासाचे वचन दिले आहे, पण आपल्याला शांततेची आवश्यकता आहे. यासंदर्भात अटलबिहारी वाजपेयी यांचा मार्गच योग्य होता, हे मोदींच्या लक्षात येईल अशी मला आशा आहे.
- दोन्ही देशांनी इतिहासाची हत्या केल्यानेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
- या पुस्कातून मी वस्तुस्थिती मांडली आहे.
- भारत-पाकिस्तान संबंधांच्या चर्चेदरम्यान सरकारबाह्य शक्तींना असता कामा नये.
- दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आहेत, ते दूर करणे, हाच हे पुस्तक लिहीण्यामागचा उद्देश होता.
- फाळणीच्या निर्णयामुळे तेथील हिंदू खूप संतापले होते, त्यामुळे पंडित जवाहरलाला नेहरूंनी लाहोरला भेट दिल्याची आठवण कसुरींनी सांगितली.
- आपसांत संवाद साधला तरच नवीन इतिहास निर्माण होऊ शकतो, दोन्ही देशांच्या सरकारनी संवाद कायम राखला पाहिजे.
- माझ्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात केल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.