शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नरेंद्र मोदींनी वाजपेयींच्या मार्गाने जावं - खुर्शीद कसुरींची अपेक्षा

By admin | Updated: October 12, 2015 19:15 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा मार्ग योग्य होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हे ओळखायला हवं आणि त्याच मार्गाने जायला हवं अशी अपेक्षा पाकस्तानचे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा मार्ग योग्य होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हे ओळखायला हवं आणि त्याच मार्गाने जायला हवं अशी अपेक्षा पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी व्यक्त केली आहे.  भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी इतिहासाचं पार खोबरं केलेलं आहे असं सांगताना पुढचा प्रवास हा सहमतीने, चर्चेने करायला हवा असं कसुरी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये चांगल्या विचारांची बुद्धीमान माणसं आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं आणि त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांबाबत प्रत्येक गोष्टीवर देखरेख करावी असं सांगतानाच संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीपेक्षा ही माणसं जास्त चांगलं आणि सकारात्मक काम करतील असा प्रस्ताव कसुरी यांनी मांडला.
सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसुरींना व कार्यक्रमाला सुरक्षा पुरवणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं सांगितलं तर शिवसेनेचा विरोध कायम राहील आणि वेट अँड वॉच करा असं सांगत शिवसेनेच्या संजय राउत यांनी कार्यक्रम उधळण्याची शक्यता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरू झाला व कुठलाही अनुचित प्रकार न घडता पारही पडला. 
इतिहासासंबंधी असलेले गैरसमज सुधारणं हा पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे असं सांगणा-या कसुरींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- दोन्ही देशांतील तणावामुळे सामान्य नागरिक, जवान शहीद होत आहेत. इच्छा असेल तर या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेलच.
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विकासाचे वचन दिले आहे, पण आपल्याला शांततेची आवश्यकता आहे. यासंदर्भात अटलबिहारी वाजपेयी यांचा मार्गच योग्य होता, हे मोदींच्या लक्षात येईल अशी मला आशा आहे.
- दोन्ही देशांनी इतिहासाची हत्या केल्यानेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
- या पुस्कातून मी वस्तुस्थिती मांडली आहे.
- भारत-पाकिस्तान संबंधांच्या चर्चेदरम्यान सरकारबाह्य शक्तींना असता कामा नये.
- दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आहेत, ते दूर करणे, हाच हे पुस्तक लिहीण्यामागचा उद्देश होता.
- फाळणीच्या निर्णयामुळे तेथील हिंदू खूप संतापले होते, त्यामुळे पंडित जवाहरलाला नेहरूंनी लाहोरला भेट दिल्याची आठवण कसुरींनी सांगितली.
- आपसांत संवाद साधला तरच नवीन इतिहास निर्माण होऊ शकतो, दोन्ही देशांच्या सरकारनी संवाद कायम राखला पाहिजे.
- माझ्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात केल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.