शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

म्यानमारमध्ये पोलिसांची आंदोलनकर्त्यांवर कारवाई; निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 05:07 IST

म्यानमारमधील सर्वांत मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या मंडालेमध्ये मंगळवारी निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले होते. तेथून पोलिसांनी २४ पेक्षा अधिक जणांना अटक केली.

यंगून : म्यानमारमध्ये सत्तापालटाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली. ही निदर्शने अवैध आहेत, असे पोलिसांनी आधीच सांगितले असले तरी शेकडो लोक रस्त्यांवर उतरले. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला व निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला.म्यानमारमधील सर्वांत मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या मंडालेमध्ये मंगळवारी निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले होते. तेथून पोलिसांनी २४ पेक्षा अधिक जणांना अटक केली.सोशल मीडियावर आलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही नेपितामध्ये पाण्याचा मारा केला व हवेत गोळ्या चालविल्या. गर्दीवर रबराच्या गोळ्यांचा मारा केल्याचेही वृत्त आहे. यामुळे अनेक जण जखमी झाल्याचे समजते.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये एक अधिकारी छोट्या बंदुकीतून गोळ्या चालविताना दिसत आहे. यात अनेक जण जखमी झाल्याचे दिसत आहे. गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे; परंतु त्याला पुष्टी मिळालेली नाही.म्यानमारमधील सत्ता निर्वाचित सरकारकडे परत करावी. त्याचबरोबर निर्वाचित नेत्या आंग स्यान सू की व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची सुटका करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.यंगून व मंडालेच्या काही भागांमध्ये सोमवारी एक आदेश जारी करून रॅली व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर रात्री आठपासून सकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.मंगळवारी बागो शहरातही निदर्शने झाली. तेथे हिंसा टाळण्यासाठी पोलिसांनी शहरातील मान्यवरांशी चर्चा केली होती. मध्य म्यानमारच्या मेगवे शहरात पाण्याचा मारा करण्यात आला. देशातील सर्वांत मोठे शहर यंगूरमध्ये शनिवारपासून निदर्शने होत आहेत. दरम्यान, देशात एका वर्षात निवडणुका घेण्यात येतील व त्यात निवडून येणाऱ्या सरकारकडे सत्ता सोपविण्यात येईल, असे सत्तापालट करणाऱ्या सैन्य कमांडरने म्हटले आहे.लष्कराने क्रूरतेने विरोध चिरडल्याचा इतिहासदेशात लष्कराने क्रूरतेने विरोध चिरडून टाकल्याचा इतिहास आहे. लष्करावर २०१७ मध्ये दहशतवादी विरोधी मोहिमेत नरसंहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सात लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांना सुरक्षेसाठी बांगलादेशात आश्रय घ्यावा लागला. सरकारी माध्यमांनी सोमवारी प्रथमच आंदोलनकर्त्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, यामुळे देशाची स्थिरता धोक्यात आली आहे. शिस्त नसेल तर लोकशाही संपू शकते, असे माहिती मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. आम्ही देशाची स्थिरता, लोकांची सुरक्षा व कायद्याच्या शासनाचे उल्लंघन करणाऱ्यांची कृत्ये रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करू, असेही म्हटले आहे. 

टॅग्स :Myanmarम्यानमार