शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

म्यानमारमध्ये पोलिसांची आंदोलनकर्त्यांवर कारवाई; निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 05:07 IST

म्यानमारमधील सर्वांत मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या मंडालेमध्ये मंगळवारी निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले होते. तेथून पोलिसांनी २४ पेक्षा अधिक जणांना अटक केली.

यंगून : म्यानमारमध्ये सत्तापालटाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली. ही निदर्शने अवैध आहेत, असे पोलिसांनी आधीच सांगितले असले तरी शेकडो लोक रस्त्यांवर उतरले. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला व निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला.म्यानमारमधील सर्वांत मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या मंडालेमध्ये मंगळवारी निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले होते. तेथून पोलिसांनी २४ पेक्षा अधिक जणांना अटक केली.सोशल मीडियावर आलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही नेपितामध्ये पाण्याचा मारा केला व हवेत गोळ्या चालविल्या. गर्दीवर रबराच्या गोळ्यांचा मारा केल्याचेही वृत्त आहे. यामुळे अनेक जण जखमी झाल्याचे समजते.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये एक अधिकारी छोट्या बंदुकीतून गोळ्या चालविताना दिसत आहे. यात अनेक जण जखमी झाल्याचे दिसत आहे. गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे; परंतु त्याला पुष्टी मिळालेली नाही.म्यानमारमधील सत्ता निर्वाचित सरकारकडे परत करावी. त्याचबरोबर निर्वाचित नेत्या आंग स्यान सू की व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची सुटका करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.यंगून व मंडालेच्या काही भागांमध्ये सोमवारी एक आदेश जारी करून रॅली व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर रात्री आठपासून सकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.मंगळवारी बागो शहरातही निदर्शने झाली. तेथे हिंसा टाळण्यासाठी पोलिसांनी शहरातील मान्यवरांशी चर्चा केली होती. मध्य म्यानमारच्या मेगवे शहरात पाण्याचा मारा करण्यात आला. देशातील सर्वांत मोठे शहर यंगूरमध्ये शनिवारपासून निदर्शने होत आहेत. दरम्यान, देशात एका वर्षात निवडणुका घेण्यात येतील व त्यात निवडून येणाऱ्या सरकारकडे सत्ता सोपविण्यात येईल, असे सत्तापालट करणाऱ्या सैन्य कमांडरने म्हटले आहे.लष्कराने क्रूरतेने विरोध चिरडल्याचा इतिहासदेशात लष्कराने क्रूरतेने विरोध चिरडून टाकल्याचा इतिहास आहे. लष्करावर २०१७ मध्ये दहशतवादी विरोधी मोहिमेत नरसंहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सात लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांना सुरक्षेसाठी बांगलादेशात आश्रय घ्यावा लागला. सरकारी माध्यमांनी सोमवारी प्रथमच आंदोलनकर्त्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, यामुळे देशाची स्थिरता धोक्यात आली आहे. शिस्त नसेल तर लोकशाही संपू शकते, असे माहिती मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. आम्ही देशाची स्थिरता, लोकांची सुरक्षा व कायद्याच्या शासनाचे उल्लंघन करणाऱ्यांची कृत्ये रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करू, असेही म्हटले आहे. 

टॅग्स :Myanmarम्यानमार