शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमध्ये पोलिसांची आंदोलनकर्त्यांवर कारवाई; निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 05:07 IST

म्यानमारमधील सर्वांत मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या मंडालेमध्ये मंगळवारी निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले होते. तेथून पोलिसांनी २४ पेक्षा अधिक जणांना अटक केली.

यंगून : म्यानमारमध्ये सत्तापालटाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली. ही निदर्शने अवैध आहेत, असे पोलिसांनी आधीच सांगितले असले तरी शेकडो लोक रस्त्यांवर उतरले. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला व निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला.म्यानमारमधील सर्वांत मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या मंडालेमध्ये मंगळवारी निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले होते. तेथून पोलिसांनी २४ पेक्षा अधिक जणांना अटक केली.सोशल मीडियावर आलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही नेपितामध्ये पाण्याचा मारा केला व हवेत गोळ्या चालविल्या. गर्दीवर रबराच्या गोळ्यांचा मारा केल्याचेही वृत्त आहे. यामुळे अनेक जण जखमी झाल्याचे समजते.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये एक अधिकारी छोट्या बंदुकीतून गोळ्या चालविताना दिसत आहे. यात अनेक जण जखमी झाल्याचे दिसत आहे. गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे; परंतु त्याला पुष्टी मिळालेली नाही.म्यानमारमधील सत्ता निर्वाचित सरकारकडे परत करावी. त्याचबरोबर निर्वाचित नेत्या आंग स्यान सू की व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची सुटका करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.यंगून व मंडालेच्या काही भागांमध्ये सोमवारी एक आदेश जारी करून रॅली व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर रात्री आठपासून सकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.मंगळवारी बागो शहरातही निदर्शने झाली. तेथे हिंसा टाळण्यासाठी पोलिसांनी शहरातील मान्यवरांशी चर्चा केली होती. मध्य म्यानमारच्या मेगवे शहरात पाण्याचा मारा करण्यात आला. देशातील सर्वांत मोठे शहर यंगूरमध्ये शनिवारपासून निदर्शने होत आहेत. दरम्यान, देशात एका वर्षात निवडणुका घेण्यात येतील व त्यात निवडून येणाऱ्या सरकारकडे सत्ता सोपविण्यात येईल, असे सत्तापालट करणाऱ्या सैन्य कमांडरने म्हटले आहे.लष्कराने क्रूरतेने विरोध चिरडल्याचा इतिहासदेशात लष्कराने क्रूरतेने विरोध चिरडून टाकल्याचा इतिहास आहे. लष्करावर २०१७ मध्ये दहशतवादी विरोधी मोहिमेत नरसंहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सात लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांना सुरक्षेसाठी बांगलादेशात आश्रय घ्यावा लागला. सरकारी माध्यमांनी सोमवारी प्रथमच आंदोलनकर्त्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, यामुळे देशाची स्थिरता धोक्यात आली आहे. शिस्त नसेल तर लोकशाही संपू शकते, असे माहिती मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. आम्ही देशाची स्थिरता, लोकांची सुरक्षा व कायद्याच्या शासनाचे उल्लंघन करणाऱ्यांची कृत्ये रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करू, असेही म्हटले आहे. 

टॅग्स :Myanmarम्यानमार