शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

भारतासाठी धोक्याची घंटा? बांग्लादेशातील नवीन सरकारने 'या' कट्टर दहशतवाद्याची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 21:30 IST

Bangladesh Terror Groups : शेख हसीना यांनी शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांसह यालाही तुरुंगात टाकले होते.

Bangladesh Terror Groups : बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळले असून, आता देशात मोबम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, हे सरकार स्थापन होताच अन्सारुल्ला बांगला टीम (ABT) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते, कारण ABT ने भारतात आपले दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळेच दोन वर्षांपूर्वी भारतीय यंत्रणांना अनेक महिने दहशतवादविरोधी अभियान राबवावे लागले होते. ABT ही अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) शी संबंधित दहशतवादी संघटना होती.

जशीमुद्दीन रहमानी तुरुंगातून बाहेर बांग्लादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी 27 ऑगस्ट रोजी गाझीपूरच्या उच्च सुरक्षा असलेल्या काशिमपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. त्याच्या एक दिवस आधीच त्याला 2008 च्या एका दहशतवादी प्रकरणात जामीन मिळाला होता. मागील शेख हसीना सरकारने जे शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांना तुरुंगात टाकले होते, त्यात याचाही समावेश होता. 

शेख हसीना सरकारने कारवाई केली शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच बांग्लादेशातील दोन तुरुंगातून अनेक संशयित दहशतवाद्यांसह 700 हून अधिक कैदी पळून गेले. त्यामुळे भारताबरोबरच बांग्लादेशातही सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्याची राजकीय अस्थिरता बांग्लादेशातील कट्टरपंथी इस्लामी घटकांच्या एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या सांगण्यावरून हे लोक भारतविरोधी कारवायांमध्येही सहभागी होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

संघटना भारतासाठी का धोका आहे?जाणकारांच्या म्हणण्यानुसार, AQIS आणि इस्लामिक स्टेट प्रामुख्याने पैसा उभारण्यासाठी बांग्लादेश आणि आसपासच्या प्रदेशात त्यांचे नेटवर्क वाढवत होते. पण, सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे भारतीय तरुणांना आपल्या संघटनेत सामावून घेण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. 

कोण आहे जशीमुद्दीन रहमानी?रहमानी याला 2013 मध्ये सेक्युलर ब्लॉगर राजीव हैदर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. 15 फेब्रुवारी 2013 रोजी रात्री हैदरची ढाका येथील घरासमोर हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी शहर न्यायालयाने फैसल बिन नईम आणि रेझवानुल आझाद राणा या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. रहमानी आणि इतर चौघांना तुरुंगवासाची शिक्षा झा

टॅग्स :BangladeshबांगलादेशterroristदहशतवादीIndiaभारत