शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भारतासाठी धोक्याची घंटा? बांग्लादेशातील नवीन सरकारने 'या' कट्टर दहशतवाद्याची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 21:30 IST

Bangladesh Terror Groups : शेख हसीना यांनी शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांसह यालाही तुरुंगात टाकले होते.

Bangladesh Terror Groups : बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळले असून, आता देशात मोबम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, हे सरकार स्थापन होताच अन्सारुल्ला बांगला टीम (ABT) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते, कारण ABT ने भारतात आपले दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळेच दोन वर्षांपूर्वी भारतीय यंत्रणांना अनेक महिने दहशतवादविरोधी अभियान राबवावे लागले होते. ABT ही अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) शी संबंधित दहशतवादी संघटना होती.

जशीमुद्दीन रहमानी तुरुंगातून बाहेर बांग्लादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी 27 ऑगस्ट रोजी गाझीपूरच्या उच्च सुरक्षा असलेल्या काशिमपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. त्याच्या एक दिवस आधीच त्याला 2008 च्या एका दहशतवादी प्रकरणात जामीन मिळाला होता. मागील शेख हसीना सरकारने जे शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांना तुरुंगात टाकले होते, त्यात याचाही समावेश होता. 

शेख हसीना सरकारने कारवाई केली शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच बांग्लादेशातील दोन तुरुंगातून अनेक संशयित दहशतवाद्यांसह 700 हून अधिक कैदी पळून गेले. त्यामुळे भारताबरोबरच बांग्लादेशातही सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्याची राजकीय अस्थिरता बांग्लादेशातील कट्टरपंथी इस्लामी घटकांच्या एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या सांगण्यावरून हे लोक भारतविरोधी कारवायांमध्येही सहभागी होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

संघटना भारतासाठी का धोका आहे?जाणकारांच्या म्हणण्यानुसार, AQIS आणि इस्लामिक स्टेट प्रामुख्याने पैसा उभारण्यासाठी बांग्लादेश आणि आसपासच्या प्रदेशात त्यांचे नेटवर्क वाढवत होते. पण, सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे भारतीय तरुणांना आपल्या संघटनेत सामावून घेण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. 

कोण आहे जशीमुद्दीन रहमानी?रहमानी याला 2013 मध्ये सेक्युलर ब्लॉगर राजीव हैदर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. 15 फेब्रुवारी 2013 रोजी रात्री हैदरची ढाका येथील घरासमोर हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी शहर न्यायालयाने फैसल बिन नईम आणि रेझवानुल आझाद राणा या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. रहमानी आणि इतर चौघांना तुरुंगवासाची शिक्षा झा

टॅग्स :BangladeshबांगलादेशterroristदहशतवादीIndiaभारत