शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

भारतासाठी धोक्याची घंटा? बांग्लादेशातील नवीन सरकारने 'या' कट्टर दहशतवाद्याची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 21:30 IST

Bangladesh Terror Groups : शेख हसीना यांनी शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांसह यालाही तुरुंगात टाकले होते.

Bangladesh Terror Groups : बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळले असून, आता देशात मोबम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, हे सरकार स्थापन होताच अन्सारुल्ला बांगला टीम (ABT) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते, कारण ABT ने भारतात आपले दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळेच दोन वर्षांपूर्वी भारतीय यंत्रणांना अनेक महिने दहशतवादविरोधी अभियान राबवावे लागले होते. ABT ही अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) शी संबंधित दहशतवादी संघटना होती.

जशीमुद्दीन रहमानी तुरुंगातून बाहेर बांग्लादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी 27 ऑगस्ट रोजी गाझीपूरच्या उच्च सुरक्षा असलेल्या काशिमपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. त्याच्या एक दिवस आधीच त्याला 2008 च्या एका दहशतवादी प्रकरणात जामीन मिळाला होता. मागील शेख हसीना सरकारने जे शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांना तुरुंगात टाकले होते, त्यात याचाही समावेश होता. 

शेख हसीना सरकारने कारवाई केली शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच बांग्लादेशातील दोन तुरुंगातून अनेक संशयित दहशतवाद्यांसह 700 हून अधिक कैदी पळून गेले. त्यामुळे भारताबरोबरच बांग्लादेशातही सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्याची राजकीय अस्थिरता बांग्लादेशातील कट्टरपंथी इस्लामी घटकांच्या एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या सांगण्यावरून हे लोक भारतविरोधी कारवायांमध्येही सहभागी होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

संघटना भारतासाठी का धोका आहे?जाणकारांच्या म्हणण्यानुसार, AQIS आणि इस्लामिक स्टेट प्रामुख्याने पैसा उभारण्यासाठी बांग्लादेश आणि आसपासच्या प्रदेशात त्यांचे नेटवर्क वाढवत होते. पण, सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे भारतीय तरुणांना आपल्या संघटनेत सामावून घेण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. 

कोण आहे जशीमुद्दीन रहमानी?रहमानी याला 2013 मध्ये सेक्युलर ब्लॉगर राजीव हैदर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. 15 फेब्रुवारी 2013 रोजी रात्री हैदरची ढाका येथील घरासमोर हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी शहर न्यायालयाने फैसल बिन नईम आणि रेझवानुल आझाद राणा या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. रहमानी आणि इतर चौघांना तुरुंगवासाची शिक्षा झा

टॅग्स :BangladeshबांगलादेशterroristदहशतवादीIndiaभारत