शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सर्वाधिक प्रतिभावंत लोक हिंदू समाजातच; एकत्र येणे गरजेचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 04:14 IST

आजच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावंत लोक केवळ हिंदू समाजातच असून, समाज घडवण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

शिकागो : आजच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावंत लोक केवळ हिंदू समाजातच असून, समाज घडवण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. हिंदू समाज एकसंघ राहिल्यास समाजाची प्रगती होईल, असा दावाही त्यांनी केला.शिकागो येथे भरलेल्या वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये ते बोलत होते. वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणला १२५ वर्षे पूर्ण झाली असून, त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, हिंदूंच्या एकजुटीमुळे समाजबांधणीला नवी दिशा मिळू शकेल. हिंदू कोणाचाही विरोध करण्यासाठी जगत नाहीत, असेही त्यांनी बोलून दाखवले. हिंदू समाज एकत्र येत नाही, त्यांचे एकत्र न येणे हीच एक समस्या आहे, असे सांगताना मोहन भागवत यांनी हिंदू समाजावर हजारो वर्षे अन्याय होत राहिल्याची तक्रार केली. हिंदू समाज आपली मूल्ये, सिद्धांत विसरल्यामुळेच असे घडले, असे सांगून ते म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक हिंदूंना विरोध करीत असतात. तसे होऊ नये, यासाठी आपणच एकत्र यायला हवे.भारतात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध या कार्यक्रमात करू पाहणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. निमंत्रण नसताना कार्यक्रमात घुसणे व गोंधळ करणे या कारणास्तव अटक केलेल्या दोघा महिलांना नंतर सोडून दिले. त्यांनी नावे न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, भारतात धार्मिक अल्पसंख्य गटांवर जो अन्याय होत आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. (वृत्तसंस्था)>वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये उपराष्ट्रपतींचेही भाषणपरिषदेत जगभरातील विविध हिंदू संघटनांचे सुमारे २,५00 मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचेही परिषदेत भाषण होणार आहे. रा. स्व. संघाचे आणखी ६ पदाधिकारी परिषदेसाठी आले आहेत. या कार्यक्रमात मोहन भागवत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंतर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत