शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

सर्वाधिक प्रतिभावंत लोक हिंदू समाजातच; एकत्र येणे गरजेचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 04:14 IST

आजच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावंत लोक केवळ हिंदू समाजातच असून, समाज घडवण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

शिकागो : आजच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावंत लोक केवळ हिंदू समाजातच असून, समाज घडवण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. हिंदू समाज एकसंघ राहिल्यास समाजाची प्रगती होईल, असा दावाही त्यांनी केला.शिकागो येथे भरलेल्या वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये ते बोलत होते. वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणला १२५ वर्षे पूर्ण झाली असून, त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, हिंदूंच्या एकजुटीमुळे समाजबांधणीला नवी दिशा मिळू शकेल. हिंदू कोणाचाही विरोध करण्यासाठी जगत नाहीत, असेही त्यांनी बोलून दाखवले. हिंदू समाज एकत्र येत नाही, त्यांचे एकत्र न येणे हीच एक समस्या आहे, असे सांगताना मोहन भागवत यांनी हिंदू समाजावर हजारो वर्षे अन्याय होत राहिल्याची तक्रार केली. हिंदू समाज आपली मूल्ये, सिद्धांत विसरल्यामुळेच असे घडले, असे सांगून ते म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक हिंदूंना विरोध करीत असतात. तसे होऊ नये, यासाठी आपणच एकत्र यायला हवे.भारतात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध या कार्यक्रमात करू पाहणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. निमंत्रण नसताना कार्यक्रमात घुसणे व गोंधळ करणे या कारणास्तव अटक केलेल्या दोघा महिलांना नंतर सोडून दिले. त्यांनी नावे न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, भारतात धार्मिक अल्पसंख्य गटांवर जो अन्याय होत आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. (वृत्तसंस्था)>वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये उपराष्ट्रपतींचेही भाषणपरिषदेत जगभरातील विविध हिंदू संघटनांचे सुमारे २,५00 मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचेही परिषदेत भाषण होणार आहे. रा. स्व. संघाचे आणखी ६ पदाधिकारी परिषदेसाठी आले आहेत. या कार्यक्रमात मोहन भागवत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंतर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत