शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सर्वाधिक प्रतिभावंत लोक हिंदू समाजातच; एकत्र येणे गरजेचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 04:14 IST

आजच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावंत लोक केवळ हिंदू समाजातच असून, समाज घडवण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

शिकागो : आजच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावंत लोक केवळ हिंदू समाजातच असून, समाज घडवण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. हिंदू समाज एकसंघ राहिल्यास समाजाची प्रगती होईल, असा दावाही त्यांनी केला.शिकागो येथे भरलेल्या वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये ते बोलत होते. वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणला १२५ वर्षे पूर्ण झाली असून, त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, हिंदूंच्या एकजुटीमुळे समाजबांधणीला नवी दिशा मिळू शकेल. हिंदू कोणाचाही विरोध करण्यासाठी जगत नाहीत, असेही त्यांनी बोलून दाखवले. हिंदू समाज एकत्र येत नाही, त्यांचे एकत्र न येणे हीच एक समस्या आहे, असे सांगताना मोहन भागवत यांनी हिंदू समाजावर हजारो वर्षे अन्याय होत राहिल्याची तक्रार केली. हिंदू समाज आपली मूल्ये, सिद्धांत विसरल्यामुळेच असे घडले, असे सांगून ते म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक हिंदूंना विरोध करीत असतात. तसे होऊ नये, यासाठी आपणच एकत्र यायला हवे.भारतात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध या कार्यक्रमात करू पाहणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. निमंत्रण नसताना कार्यक्रमात घुसणे व गोंधळ करणे या कारणास्तव अटक केलेल्या दोघा महिलांना नंतर सोडून दिले. त्यांनी नावे न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, भारतात धार्मिक अल्पसंख्य गटांवर जो अन्याय होत आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. (वृत्तसंस्था)>वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये उपराष्ट्रपतींचेही भाषणपरिषदेत जगभरातील विविध हिंदू संघटनांचे सुमारे २,५00 मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचेही परिषदेत भाषण होणार आहे. रा. स्व. संघाचे आणखी ६ पदाधिकारी परिषदेसाठी आले आहेत. या कार्यक्रमात मोहन भागवत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंतर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत