शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

मंडाले आणि रत्नागिरीचे शतकाहूनही जुने नाते, म्यानमार-भारत संबंधाचा दुवा

By अोंकार करंबेळकर | Updated: September 5, 2017 13:12 IST

19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातील झालेल्या दोन घटनांनी या शहरांमध्ये एक घट्ट नाते निर्माण झाले. आजही दोन्ही देशांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या शहरांची नावे लिहिलेली आहेत.

मुंबई, दि.5- म्यानमारमधील मंडाले हे आज रंगून आणि प्रशासकीय राजधानी नाय पी डॉव यांच्यानंतरचे महत्त्वाचे शहर आहे. म्यानमारच्या राजघराण्याने या शहरालाच राजधानी बनवून पिढ्यानपिढ्या येथे राज्य चालवले होते. या शहराचा आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी शहराचा कोणत्याही प्रकारे संबंध येण्याची इतिहासात सुतराम शक्यता नव्हती. मात्र 19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातील झालेल्या दोन घटनांनी या शहरांमध्ये एक घट्ट नाते निर्माण झाले. आजही दोन्ही देशांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या शहरांची नावे लिहिलेली आहेत.

म्यानमारचा अखेरचा राजा थिबा 1 ऑक्टोबर 1878 रोजी राजगादीवर बसला आणि पुढच्याच महिन्यात 6 तारखेस त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. राजधानी मंडालेमधूनच तो आपला राज्यकारभार करु लागला. मात्र 1885 साली इंग्रजांनी त्याचे राज्य हस्तगत करून त्याचे पद खालसा केले. 24 तासांच्या आत अगदी लहानसहान प्रतिकाराला सहज मोडून काढत इंग्रजांनी मंडालेवर ताबा मिळवला आणि थिबाला त्याच्या कुटुंबासकट म्यानमार सोडून जाण्याचा आदेश देऊन बाहेर काढण्यात आलं. हजारो नागरिकांच्या समोर बैलगाडीमध्ये बसून थिबा आणि त्याच्या कुटुंबाला इरावदी नदीतील बोटीवर जाऊन बसावं लागलं होतं. त्यानंतर थिबाला रत्नागिरीमध्ये आणण्यात आले. रत्नागिरीत राहण्यापुर्वी 1857 च्या बंडाला मोडून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर जेम्स आउट्राम यांच्या खान्देशातील घरात थिबाला व त्याच्या कुटुंबाला ठेवण्यात आलं. त्यानंतर रत्नागिरीमध्ये त्याच्यासाठी राजवाडा बांधण्यात आला. जांभ्या दगडाने बांधलेला हा वाडा थिबा राजवाडा किंवा थिबा पॅलेस नावाने आजही ओळखला जाते. आपल्या गावापासून तोडून लांब भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर लहानशा गावात ठेवलं म्हणजे  ब्रह्मदेशाच्या अंतर्गत बाबींमध्ये त्याला हस्तक्षेप करता येणार नाही असा ब्रिटिशांचा यामागे हेतू होता. थिबाला पहिली पाच वर्षे 1 लाख रुपये प्रतिमहिना पेन्शन देण्यात आले. त्यानंतर ते पन्नास हजारांवर आणले गेले आणि शेवटी तर 25 हजार करण्यात आले. थिबाचा सर्वतोपरी अपमान करण्याची एकही संधी ब्रिटिशांनी सोडली नाही असं सांगितलं जातं. मंडाले आणि म्यानमारची आठवण काढतच थिबाला वयाच्या 57 व्या वर्षी 1916 साली मृत्यू आला. रत्नागिरीत त्याचं अत्यंत साधं थडगं असून त्या जांभ्याने बनलेल्या कातळावरच त्याला विश्रांती घ्यावी लागली. 

थिबाच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय ब्रह्मदेशात परत गेले मात्र त्याची एक मुलगी फाया ग्यी किंवा फाया हिने गोपाळ सावंत या राजवाड्यातच काम करणाऱ्या व्यक्तीशी प्रेमविवाह केला होता. फाया मात्र भारतातच राहिली. गोपाळराव आणि फाया यांना टू टू नावाची मुलगीही झाली. एकेकाळी राजकन्या म्हणून वावरणाऱ्या फायाला आयुष्याच्या उत्तरार्धात अत्यंत हलाखीचे दिवस काढावे लागले. इतके की तिच्या निधनानंतर वर्गणी काढून अंत्यसंस्कार करावे लागले असे सांगण्यात येते. टू टूचेही आयुष्य असेच गरिबीमध्ये गेले. तिला 11 मुले असून आजही रत्नागिरीमध्ये थिबाचे हे वंशज राहतात. मंडालेतून आलेला हा राजा रत्नागिरीतच राहिला आणि त्याच्या कुटुंबाची एक शाखा इथेच रुजली.

मंडाले आणि रत्नागिरीचा संबंध हा थिबापुरताच मर्यादित राहणार नव्हता. याच रत्नागिरीत जन्मलेल्या एका थोर व्यक्तीचा मंडालेशी संबंध येणार होता. ही व्यक्ती होती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरीत जन्मलेल्या लोकमान्य टिळकांना ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली याच मंडालेला कारागृहात ठेवले. 1908 ते 1914 अशी सहा वर्षे लोकमान्यांना मंडालेला काढावी लागली. एकमेकांपासून हजारो किलोमीटर लांब असणारी ही गावं एकमेकांशी अशी जोडली गेली आणि इतिहासाच्या पानांमध्ये कायमची जाऊन बसली.