शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

मोदींचा इस्त्रायल दौरा आपल्या सुरक्षेसाठी धोका - पाकिस्तान मीडिया

By admin | Updated: July 6, 2017 16:53 IST

मोदींच्या ऐतिहासिक इस्त्रायल दौ-यामुळे दोन्ही देशांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका घेणारा पाकिस्तान मात्र संशयाने पाहत आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक इस्त्रायल दौ-यामुळे दोन्ही देशांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका घेणारा पाकिस्तान मात्र संशयाने पाहत आहे. मोदींच्या इस्त्रायल दौ-यामागे पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याला आव्हान देण्याचा कट असल्याचा दावा पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमं करत आहेत. महत्वाचं म्हणजे अनेक प्रसारमाध्यमांना आपलं लक्ष फक्त दौ-यावर केंद्रीत केलं असताना, अनेक इंग्लिश आणि उर्दू वृत्तपत्रांनी फक्त जुजबी माहिती देण्याचं काम केलं आहे. 
 
आणखी वाचा -
आय फॉर इंडिया, आय फॉर इस्रायल!
भारत आणि इस्रायलमध्ये 7 महत्त्वपूर्ण करार
दहशतवादाच्या राक्षसाला नष्ट करू
 
डॉन वृत्तपत्राने वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीचा आधार घेत मोदींच्या दौ-याची बातमी दिली. "इस्त्रायलला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान", अशी हेडलाईन त्यांनी दिली होती. तर "द एक्स्प्रेस ट्रिब्यून"ने दिलेल्या बातमीत "इस्त्रायलमध्ये राहणा-या भारतीय ज्यूंसाठी मोदींच्या दौ-याचं विशेष महत्व" असा उल्लेख करण्यात आला आहे.
 
चॅनेल 42 ने तर मोदींचा इस्त्राईल दौरा म्हणजे इस्लामाबादविरोधात कारवाई करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेली हातमिळवणी असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्ली आणि तेल अवीवमधील संबंधांचा यावेळी उल्लेख करण्यात आला आहे. "भारत आणि इस्त्रायलची वाढती जवळीक काही नवी नसून, याआधीही पाहायला मिळाली आहे, पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी इस्त्रायलने वारंवार भारताला मदत केली आहे", असाही दावा चॅनेलने केला आहे.
 
सुरक्षा विश्लेषक अली यांनी तर हिंदू आणि इस्त्रायलमध्ये जास्त काही फरक नसल्याचं सांगितलं आहे. "भारत आणि इस्त्रायलमध्ये देशहितासंबंधी झालेल्या बैठकीचा अर्थ पाकिस्तानने दोन्ही देशांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या सुरक्षेवर पडणार आहे, जे आपल्या हिताचं नाही", असं अली बोलले आहेत. यावेळी अली यांनी पाकिस्तानला आपल्या देशहिताकडे लक्ष देत त्याप्रमाणे पाऊलं उचलणं गरजे असल्याचंही सांगितलं आहे.
 
"आज जेव्हा सौदी अरेबिया इस्त्रायलशी संबंध जोडण्याचा विचार करत आहे, तिथे पाकिस्तानने आपल्या देशहितासाठी काय करायला हवं याचा विचार करणं गरजेचं आहे. भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणांवर करडी नजर ठेवली पाहिजे", असंही अली बोलले आहेत. 
 
एकीकडे मोदींच्या दौ-यामुळे अनेकजण चिंता व्यक्त करत असताना काहीजणांनी पाकिस्तानला घऱचा आहेर देत आपल्या परराष्ट्र धोरणांवर विचार करण्याचा सल्ला दिला आहे. 
 
परवेज मुशर्रफ सत्तेत असताना 2005 रोजी पाकिस्तानने इस्त्रायलशी संपर्क साधला होता. त्यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी आणि इस्त्रायलचे सिल्वन शॅलोम यांच्यात इस्तंबूल येथे बैठकही झाली होती. त्यावेळी सिल्वन शॅलोम यांनी या भेटीचा ऐतिहासिक भेट म्हणून उल्लेख केला होता. मात्र यानंतर कोणतीही प्रगती झाली नाही, आणि दोन्ही देशांचा संपर्क तुटला.