शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी आयटी दिग्गजांसमक्ष मांडले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न

By admin | Updated: September 28, 2015 02:27 IST

महत्त्वांकाक्षी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेची कल्पना जगभरातील आयटी दिग्गजांसमक्ष मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजात अधिकाधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्याची ग्वाही दिली आहे

सान जोस: महत्त्वांकाक्षी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेची कल्पना जगभरातील आयटी दिग्गजांसमक्ष मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजात अधिकाधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्याची ग्वाही दिली आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गजांच्या डाट्याबाबत गोपनीयता आणि सुरक्षितता बाळगण्याबाबत त्यांनी उपस्थितांना आश्वस्तही केले.सिलिकॉन व्हॅलीमधील सान जोस येथे विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी(सीईओ) आयोजित रात्रीभोज कार्यक्रमात ते बोलत होते. आमची अर्थव्यवस्था आणि जीवन आता आणखी तारांनी जोडले जाणार असताना आम्ही डाट्याची गोपनीयता, सुरक्षा, बौद्धिक संपदा अधिकार आणि सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अ‍ॅडॉबचे सीईओ शांतनू नारायण, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला, क्वॉलकॉमचे कार्यकारी चेअरमेन पॉल जेकब्स, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई उपस्थित होते.ई-गव्हर्नन्सवर भर ई- गव्हर्नन्सचा अधिक प्रभावीरीत्या वापर करीत आम्ही प्रशासनात बदल घडवून आणत आहोत. अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी ई-प्रशासनाचा सहभाग वाढविला जाईल. १ अब्ज सेलफोन असलेल्या भारतात मोबाईल गव्हर्नन्सच्या माध्यमातून विकासाला वास्तवात सर्वसमावेशक बनविण्याची क्षमता आहे. त्यामुळे ई गव्हर्नन्स सर्वांपर्यंत पोहोचेल, असेही मोदी म्हणाले. डिजिटल इंडियाच्या संकल्पनेमागचा विचार स्पष्ट करताना ते म्हणाले की, लोकांच्या जीवनात वेगाने बदल घडवून आणण्याचे हे सर्वात चांगले माध्यम आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ब्रॉडबँडने जोडले जाईल.आय-वेजची निर्मिती ही हाय-वेच्या निर्मितीसारखीच महत्त्वपूर्ण आहे. वायफाय सुविधा केवळ विमानतळाच्या लाऊंजपुरती सीमित राहू नये. गुगलच्या मदतीने आम्ही अल्पावधीत ५०० रेल्वेस्थानकांना त्या कक्षेत आणणार आहोत. आम्हाला दस्तऐवजरहित काम करायचे आहे. प्रत्येक नागरिकासाठी डिजिटल लॉकरची व्यवस्था केली जाईल. आम्हाला खासगी दस्तऐवज त्याठिकाणी साठवून ठेवता येईल. अंतराळ तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या माध्यमातून १७० अप्लिकेशन्सची ओळख पटविण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील डाट्याचा २४ तासांत नव्हे तर २४ मिनिटांत निपटारा करता येईल.अ‍ॅप्पलच्या सीईओंना भारतात उत्पादन केंद्र स्थापण्यासाठी निमंत्रणमोदींनी अ‍ॅप्पलचे सीईओ टीम कूक यांना भारतात उत्पादन केंद्र स्थापन करण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अ‍ॅप्पलच्या फॉक्सकॉन या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकारांना सांगितले. अ‍ॅप्पल विकास टूल्सच्या माध्यमातून बड्या उद्योगाचा भाग बनू शकतात. चीनमध्ये या उद्योगातून १५ लाख लोकांना रोजगार देण्यात आल्याचा उल्लेखही कूक यांनी मोदींसोबत झालेल्या बैठकीत केला.जनधन योजनेत भागीदारीबाबतही मोदींनी कूक यांच्याशी चर्चा केली. अ‍ॅप्पलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात भारतासाठी विशेष स्थान आहे. स्टीव्ह जॉब्स युवावस्थेत भारतात आले होते. भारतात जे बघितले त्यापासून प्रेरणा घेतच त्यांनी अ‍ॅप्पलची सुरुवात केली होती, असेही कूक यांनी म्हटल्याची माहिती स्वरूप यांनी दिली. (वृत्तसंस्था)