शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

मोदी-शी जिनपिंग यांची चाय पे चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली.

वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली. पण या चर्चेत डोकलाम तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मात्र उल्लेख झाला नाही. हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताचा त्यास आक्षेप आहे. या दोघा नेत्यांत या विषयांवर चर्चा झाली नाही, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.दोघे नेते सकाळी एकत्र चहा प्यायले. तरुणी चहा तयार करीत असताना मोदी बारकाईने त्याकडे पाहत होेते. नंतर स्वत: हातात चहाची किटली घेऊन मोदी यांनी भारतातील चहाच्या पद्धतीची त्यांना माहिती दिली.दोन देशांतील संबंध सुधारणे हा मुख्यत: चर्चेचा गाभा होता. परस्पर संवाद, परस्पर विश्वास यांचे वातावरण तयार करताना सीमेवर तणाव कमी व्हावा, या दृष्टीने पावले टाकण्याचे दोघांनी मान्य केले. तशा सूचना दोन्ही देशांच्या लष्करांना दिल्या जातील. दोन्ही लष्करांत सामंजस्याचे संबंध असावेत, असेही ठरले.नरेंद्र मोदी यांनी विचार, सहकार, सुसंवाद, बांधिलकी तसेच स्वप्नपूर्ती या नव्या पंचसूत्रीचा उल्लेख केला. व्यापारी संबंध सुधारण्यावर दोन्ही नेत्यांत एकमत झाले. दहशतवादाच्या धोक्याविषयीही मतैक्य होते. मात्र पाककडून दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद व आश्रय यांचा चर्चेत उल्लेख झाला नाही. पर्यावरणातील बदलांची दखलही मोदी व शी जिनपिंग यांनी घेतली.मोदी व जिनपिंग यांनी वुहानच्या ईस्ट लेक तलावापाशी आज मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर दोघांनी त्या तलावात नौकानयनही केले. बोटीच्या वरच्या मजल्यावरून अतिशय स्वच्छ असलेल्या तलावाची पाहणी करताना, मोदी यांनी भारतातील नदी स्वच्छता मोहिमेसाठी चीनकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे सांगितले. गंगा नदी स्वच्छ अभियानाची त्यांना माहिती दिली. वुहान हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.चौथा दौरा, अनेकदा भेटमोदी यांचा चार वर्षांतील हा चौथा चीन दौरा आहे. या चार वर्षांत मोदी व शी जिनपिंग यांची अनेकदा भेट झाली. पुन्हा जूनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी मोदी चीनला जाणार आहेत. या दोन नेत्यांतील चर्चा व संबंध सुधारणा यांविषयी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी आनंद व्यक्त केला आहे.चीन सातत्याने सीमेवर कागाळ्या करीत असतो. तसेच अरुणाचलच्या सीमेवर आपल्या हद्दीत चीनने मोठी बांधकामे सुरू केली आहेत. त्यामुळे अनेकदा तेथून व उत्तराखंडात चिनी सैन्य घुसखोरी करीत असते. काही वेळा चीनची हेलिकॉप्टर्सही भारतीय हद्दीत घुसतात.पुढील वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या काळात चीनकडून कोणतीही कागाळी होऊ नये, असा पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न आहे. एकीकडे पाकिस्तानकडून हल्ले, अतिरेक्यांची घुसखोरी सुरू असताना चीनकडून अडचणी नकोत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी