शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

मोदी-शी जिनपिंग यांची चाय पे चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली.

वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली. पण या चर्चेत डोकलाम तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मात्र उल्लेख झाला नाही. हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताचा त्यास आक्षेप आहे. या दोघा नेत्यांत या विषयांवर चर्चा झाली नाही, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.दोघे नेते सकाळी एकत्र चहा प्यायले. तरुणी चहा तयार करीत असताना मोदी बारकाईने त्याकडे पाहत होेते. नंतर स्वत: हातात चहाची किटली घेऊन मोदी यांनी भारतातील चहाच्या पद्धतीची त्यांना माहिती दिली.दोन देशांतील संबंध सुधारणे हा मुख्यत: चर्चेचा गाभा होता. परस्पर संवाद, परस्पर विश्वास यांचे वातावरण तयार करताना सीमेवर तणाव कमी व्हावा, या दृष्टीने पावले टाकण्याचे दोघांनी मान्य केले. तशा सूचना दोन्ही देशांच्या लष्करांना दिल्या जातील. दोन्ही लष्करांत सामंजस्याचे संबंध असावेत, असेही ठरले.नरेंद्र मोदी यांनी विचार, सहकार, सुसंवाद, बांधिलकी तसेच स्वप्नपूर्ती या नव्या पंचसूत्रीचा उल्लेख केला. व्यापारी संबंध सुधारण्यावर दोन्ही नेत्यांत एकमत झाले. दहशतवादाच्या धोक्याविषयीही मतैक्य होते. मात्र पाककडून दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद व आश्रय यांचा चर्चेत उल्लेख झाला नाही. पर्यावरणातील बदलांची दखलही मोदी व शी जिनपिंग यांनी घेतली.मोदी व जिनपिंग यांनी वुहानच्या ईस्ट लेक तलावापाशी आज मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर दोघांनी त्या तलावात नौकानयनही केले. बोटीच्या वरच्या मजल्यावरून अतिशय स्वच्छ असलेल्या तलावाची पाहणी करताना, मोदी यांनी भारतातील नदी स्वच्छता मोहिमेसाठी चीनकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे सांगितले. गंगा नदी स्वच्छ अभियानाची त्यांना माहिती दिली. वुहान हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.चौथा दौरा, अनेकदा भेटमोदी यांचा चार वर्षांतील हा चौथा चीन दौरा आहे. या चार वर्षांत मोदी व शी जिनपिंग यांची अनेकदा भेट झाली. पुन्हा जूनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी मोदी चीनला जाणार आहेत. या दोन नेत्यांतील चर्चा व संबंध सुधारणा यांविषयी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी आनंद व्यक्त केला आहे.चीन सातत्याने सीमेवर कागाळ्या करीत असतो. तसेच अरुणाचलच्या सीमेवर आपल्या हद्दीत चीनने मोठी बांधकामे सुरू केली आहेत. त्यामुळे अनेकदा तेथून व उत्तराखंडात चिनी सैन्य घुसखोरी करीत असते. काही वेळा चीनची हेलिकॉप्टर्सही भारतीय हद्दीत घुसतात.पुढील वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या काळात चीनकडून कोणतीही कागाळी होऊ नये, असा पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न आहे. एकीकडे पाकिस्तानकडून हल्ले, अतिरेक्यांची घुसखोरी सुरू असताना चीनकडून अडचणी नकोत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी