शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

मोदी-शी जिनपिंग यांची चाय पे चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली.

वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली. पण या चर्चेत डोकलाम तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मात्र उल्लेख झाला नाही. हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताचा त्यास आक्षेप आहे. या दोघा नेत्यांत या विषयांवर चर्चा झाली नाही, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.दोघे नेते सकाळी एकत्र चहा प्यायले. तरुणी चहा तयार करीत असताना मोदी बारकाईने त्याकडे पाहत होेते. नंतर स्वत: हातात चहाची किटली घेऊन मोदी यांनी भारतातील चहाच्या पद्धतीची त्यांना माहिती दिली.दोन देशांतील संबंध सुधारणे हा मुख्यत: चर्चेचा गाभा होता. परस्पर संवाद, परस्पर विश्वास यांचे वातावरण तयार करताना सीमेवर तणाव कमी व्हावा, या दृष्टीने पावले टाकण्याचे दोघांनी मान्य केले. तशा सूचना दोन्ही देशांच्या लष्करांना दिल्या जातील. दोन्ही लष्करांत सामंजस्याचे संबंध असावेत, असेही ठरले.नरेंद्र मोदी यांनी विचार, सहकार, सुसंवाद, बांधिलकी तसेच स्वप्नपूर्ती या नव्या पंचसूत्रीचा उल्लेख केला. व्यापारी संबंध सुधारण्यावर दोन्ही नेत्यांत एकमत झाले. दहशतवादाच्या धोक्याविषयीही मतैक्य होते. मात्र पाककडून दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद व आश्रय यांचा चर्चेत उल्लेख झाला नाही. पर्यावरणातील बदलांची दखलही मोदी व शी जिनपिंग यांनी घेतली.मोदी व जिनपिंग यांनी वुहानच्या ईस्ट लेक तलावापाशी आज मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर दोघांनी त्या तलावात नौकानयनही केले. बोटीच्या वरच्या मजल्यावरून अतिशय स्वच्छ असलेल्या तलावाची पाहणी करताना, मोदी यांनी भारतातील नदी स्वच्छता मोहिमेसाठी चीनकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे सांगितले. गंगा नदी स्वच्छ अभियानाची त्यांना माहिती दिली. वुहान हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.चौथा दौरा, अनेकदा भेटमोदी यांचा चार वर्षांतील हा चौथा चीन दौरा आहे. या चार वर्षांत मोदी व शी जिनपिंग यांची अनेकदा भेट झाली. पुन्हा जूनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी मोदी चीनला जाणार आहेत. या दोन नेत्यांतील चर्चा व संबंध सुधारणा यांविषयी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी आनंद व्यक्त केला आहे.चीन सातत्याने सीमेवर कागाळ्या करीत असतो. तसेच अरुणाचलच्या सीमेवर आपल्या हद्दीत चीनने मोठी बांधकामे सुरू केली आहेत. त्यामुळे अनेकदा तेथून व उत्तराखंडात चिनी सैन्य घुसखोरी करीत असते. काही वेळा चीनची हेलिकॉप्टर्सही भारतीय हद्दीत घुसतात.पुढील वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या काळात चीनकडून कोणतीही कागाळी होऊ नये, असा पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न आहे. एकीकडे पाकिस्तानकडून हल्ले, अतिरेक्यांची घुसखोरी सुरू असताना चीनकडून अडचणी नकोत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी