शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

'भारत-पाकिस्तान फाळणीचा निर्णय योग्यच होता हे मोदींनी सिद्ध केलं' 

By sagar sirsat | Updated: August 14, 2017 20:37 IST

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंय

ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंयआमचे आई-वडील फाळणीबाबत बोलताना, भारतात समान संधी व समान अधिकार मिळणार नाहीत असं म्हणायचे, आता नरेंद्र मोदींनी तो विचार योग्य होता हे सिद्ध केलंय

नवी दिल्ली, दि. 14 - भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंय, असं विधान फाळणीला 70 वर्ष पूर्ण होत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक़-ए-इंसाफ़ (पीटीआई) पार्टीचे नेता इम्रान खान यांनी केलं आहे.

'माझी पिढी फाळणीनंतरची पहिलीच पिढी होती. पाकिस्तानचं वय अवघं 5 वर्ष असताना माझा जन्म झाला, त्यामुळे फाळणीचं दुःख मला चांगलं माहितीये. आम्ही मोठे होत असताना आमचे आई-वडील फाळणीबाबत बोलताना, भारतात समान संधी व समान अधिकार मिळणार नाहीत असं म्हणायचे, आता नरेंद्र मोदींनी तो विचार योग्य होता हे सिद्ध केलंय. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलं आहे' असं इम्रान खान म्हणाले.    

बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत, असं मला वाटतं. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी याला कारणीभूत आहेत. मोदींची विचार सांप्रदायिक आहे आणि त्यांचे कट्टरपंथी हिंदूंसोबत संबंध आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांची मुस्लिमांविरोधी प्रतिमा समोर आली होती, असं इम्रान खान म्हणाले. 

मोदी आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी दोन्ही एकाचं पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. वाजपेयी पंतप्रधान बनले त्यावेळी दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले जाणार अशी चिंता होती. पण त्यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांचे संबंध चांगले राहिले. मोदींना चांगला जनादेश मिळाला आहे. दोन्ही देश अजून जवळ येऊ शकत होते पण मोदींनी निराशा केली. मोदींनी केवळ पाकिस्तानलाच नाही तर भारतीय मुसलमानांनाही निराश केलं आहे. उदारवादी विचार असणा-या सगळ्यांचीच मोदींनी निराशा केली, असं इम्रान खान म्हणाले.