शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

'भारत-पाकिस्तान फाळणीचा निर्णय योग्यच होता हे मोदींनी सिद्ध केलं' 

By sagar sirsat | Updated: August 14, 2017 20:37 IST

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंय

ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंयआमचे आई-वडील फाळणीबाबत बोलताना, भारतात समान संधी व समान अधिकार मिळणार नाहीत असं म्हणायचे, आता नरेंद्र मोदींनी तो विचार योग्य होता हे सिद्ध केलंय

नवी दिल्ली, दि. 14 - भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंय, असं विधान फाळणीला 70 वर्ष पूर्ण होत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक़-ए-इंसाफ़ (पीटीआई) पार्टीचे नेता इम्रान खान यांनी केलं आहे.

'माझी पिढी फाळणीनंतरची पहिलीच पिढी होती. पाकिस्तानचं वय अवघं 5 वर्ष असताना माझा जन्म झाला, त्यामुळे फाळणीचं दुःख मला चांगलं माहितीये. आम्ही मोठे होत असताना आमचे आई-वडील फाळणीबाबत बोलताना, भारतात समान संधी व समान अधिकार मिळणार नाहीत असं म्हणायचे, आता नरेंद्र मोदींनी तो विचार योग्य होता हे सिद्ध केलंय. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलं आहे' असं इम्रान खान म्हणाले.    

बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत, असं मला वाटतं. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी याला कारणीभूत आहेत. मोदींची विचार सांप्रदायिक आहे आणि त्यांचे कट्टरपंथी हिंदूंसोबत संबंध आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांची मुस्लिमांविरोधी प्रतिमा समोर आली होती, असं इम्रान खान म्हणाले. 

मोदी आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी दोन्ही एकाचं पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. वाजपेयी पंतप्रधान बनले त्यावेळी दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले जाणार अशी चिंता होती. पण त्यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांचे संबंध चांगले राहिले. मोदींना चांगला जनादेश मिळाला आहे. दोन्ही देश अजून जवळ येऊ शकत होते पण मोदींनी निराशा केली. मोदींनी केवळ पाकिस्तानलाच नाही तर भारतीय मुसलमानांनाही निराश केलं आहे. उदारवादी विचार असणा-या सगळ्यांचीच मोदींनी निराशा केली, असं इम्रान खान म्हणाले.