शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'भारत-पाकिस्तान फाळणीचा निर्णय योग्यच होता हे मोदींनी सिद्ध केलं' 

By sagar sirsat | Updated: August 14, 2017 20:37 IST

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंय

ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंयआमचे आई-वडील फाळणीबाबत बोलताना, भारतात समान संधी व समान अधिकार मिळणार नाहीत असं म्हणायचे, आता नरेंद्र मोदींनी तो विचार योग्य होता हे सिद्ध केलंय

नवी दिल्ली, दि. 14 - भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंय, असं विधान फाळणीला 70 वर्ष पूर्ण होत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक़-ए-इंसाफ़ (पीटीआई) पार्टीचे नेता इम्रान खान यांनी केलं आहे.

'माझी पिढी फाळणीनंतरची पहिलीच पिढी होती. पाकिस्तानचं वय अवघं 5 वर्ष असताना माझा जन्म झाला, त्यामुळे फाळणीचं दुःख मला चांगलं माहितीये. आम्ही मोठे होत असताना आमचे आई-वडील फाळणीबाबत बोलताना, भारतात समान संधी व समान अधिकार मिळणार नाहीत असं म्हणायचे, आता नरेंद्र मोदींनी तो विचार योग्य होता हे सिद्ध केलंय. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलं आहे' असं इम्रान खान म्हणाले.    

बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत, असं मला वाटतं. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी याला कारणीभूत आहेत. मोदींची विचार सांप्रदायिक आहे आणि त्यांचे कट्टरपंथी हिंदूंसोबत संबंध आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांची मुस्लिमांविरोधी प्रतिमा समोर आली होती, असं इम्रान खान म्हणाले. 

मोदी आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी दोन्ही एकाचं पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. वाजपेयी पंतप्रधान बनले त्यावेळी दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले जाणार अशी चिंता होती. पण त्यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांचे संबंध चांगले राहिले. मोदींना चांगला जनादेश मिळाला आहे. दोन्ही देश अजून जवळ येऊ शकत होते पण मोदींनी निराशा केली. मोदींनी केवळ पाकिस्तानलाच नाही तर भारतीय मुसलमानांनाही निराश केलं आहे. उदारवादी विचार असणा-या सगळ्यांचीच मोदींनी निराशा केली, असं इम्रान खान म्हणाले.