शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नवाझ शरीफांनी पाकिस्तानी लष्कराबद्दल वापरली मोदींसारखीच भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 13:17 IST

दहशतवाद्यांविरुद्ध पाकिस्तानी लष्कर कारवाई करत नसल्याने शरीफ सरकार नाखूष असल्याचे वृत्त डॉनने प्रसिद्ध केले होते. 

ठळक मुद्देनवाझ शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन गच्छंती झाल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी इमरान यांनी जाहीर सभा घेतली. भ्रष्टाचार लपवण्यासाठी नवाझ शरीफ वेळप्रसंगी पाकिस्तानच्या हिताशीही तडजोड करतील आपल्याच लष्कराचा अपमान करणारा नेता मी पाहिलेला नाही

लाहोर, दि. 31 - पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी लष्कराबद्दल जी भाषा वापरतात तशाच भाषेचा प्रयोग करुन माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराचा अपमान केला आहे असा आरोप तेहरीक-इ-इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वा इमरान खान यांनी केला आहे. खान यांच्या आरोपामागे मागच्यावर्षी डॉनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ होता. दहशतवाद्यांविरुद्ध पाकिस्तानी लष्कर कारवाई करत नसल्याने शरीफ सरकार नाखूष असल्याचे वृत्त डॉनने प्रसिद्ध केले होते. 

नवाझ शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन गच्छंती झाल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी इमरान यांनी रविवारी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी हे आरोप केले. भ्रष्टाचार लपवण्यासाठी नवाझ शरीफ वेळप्रसंगी पाकिस्तानच्या हिताशीही तडजोड करतील आणि शत्रूंशी हातमिळवणी करतील असा आरोप इमरान यांनी केला. 

डॉनच्या वृत्ताचा हवाला देऊन इमरान खान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी लष्कराबद्दल जी भाषा वापरतात तशीच कृती नवाझ शरीफ यांनी केली. यापेक्षा बेईमानी काय असू शकते ? असा सवाल त्यांनी केला. आपल्याच लष्कराचा अपमान करणारा नेता मी पाहिलेला नाही असे इमरान खान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांच्यामध्ये काहीही फरक नाही असे इमरान खान काही महिन्यांपूर्वी एका सभेत म्हणाले होते. 

पनामा प्रकरणात नवाझ शरीफ यांचे नाव आल्यापासून इमरान खान यांनी पाकिस्तानात त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली होती. पुढच्यावर्षी पाकिस्तानात होणा-या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हा विषय तापवत ठेऊन लाभ उठवण्याची त्यांची रणनिती आहे. नामा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर इमरान खान यांनीही नवाज शरीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. ही तर फक्त सुरुवात आहे, असं म्हणत त्यांनी शरीफ यांना सूचक इशारा दिला. 

संयुक्त तपास पथकानं 60 दिवसांत जे केले ते कोणालाही शक्य नव्हतं. या निर्णयानंतर स्पष्ट झालं आहे की, पाकिस्तानकडे भ्रष्टाचार रोखण्याची क्षमता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकांमध्ये न्याय व्यवस्थेप्रति विश्वास निर्माण झाला आहे. मी पाकिस्तानमधील लोकशाही, गरिबांच्या सशक्तीकरणासाठी संघर्ष केल्याचंही ते म्हणाले आहेत. शरीफ यांच्या परिवाराला मी 40 वर्षांपासून ओळखतो आहे. माझी त्यांच्या परिवाराशी कोणतंच वैयक्तिक वैर नाही असे इमरान खान म्हणाले होते.