शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

मोदी सरकारचे आता 'मिशन PoK'; राजनाथ सिंहांनी पुन्हा ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 13:48 IST

हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित 'जन आशीर्वाद यात्रेच्या' प्रारंभी ते बोलत होते. ही यात्रा संपूर्ण हरियाणातील ९० विधानसभा मतदार संघातून जाणार आहे.

नवी दिल्ली : काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यावर भारताचे यापुढेचे लक्ष पाकव्याप्त काश्मीर असल्याचे स्पष्ट आता दिसून येत आहेत. या संदर्भात पुष्टी देणारे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. भविष्यात पाकिस्तानसोबत संवाद झाला यात तो पाकव्याप्त काश्मीर याच मुद्द्यावर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित 'जन आशीर्वाद यात्रेच्या' प्रारंभी ते बोलत होते. ही यात्रा संपूर्ण हरियाणातील ९० विधानसभा मतदार संघातून जाणार आहे. त्यात रोहतक इथे ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या रॅलीचा समावेश आहे. 

यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, ' कलम ३७० हे काश्मीरच्या विकासात अडथळा बनू पाहत होते. त्यामुळे ते हटवण्यात आले. मात्र सध्या शेजारील ही भारताने केलेली चूक आहे असे सांगत आंतराराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावीत आहे. मात्र पाकिस्तानशी संवाद झाला तर तो फक्त त्यांनी दहशतवादी संघटनांना बळ न देण्याच्या मुद्द्यावर होईल. पण आता तो संवाद पाक व्याप्त काश्मीरच्या प्रश्नावरही होणार असल्याचे ठणकवायलाही ते विसरले नाहीत.

पुढे ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे विधान केले. याचाच अर्थ बालाकोटमध्ये भारताने काय केले हे पाकिस्तानचे पंतप्रधान पूर्ण जाणून आहेत. भारताने अणुशक्तीचा वापर करण्याच्या नियमाच्या बदलाविषयी चाचपणी केल्यावर लगेचच त्यांचे विधान आले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर