शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

चीनची रेल्वेच्या माध्यमातून बिहारपर्यंत पोहोचण्याची मनीषा

By admin | Updated: May 24, 2016 18:37 IST

नेपाळला रोड आणि रेल्वेच्या माध्यमातून तिबेटशी जोडल्यानंतर आता चीन बिहारपर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा विचार करतं आहे.

 ऑनलाइन लोकमत

चीन, दि. 24-  नेपाळला रोड आणि रेल्वेच्या माध्यमातून तिबेटशी जोडल्यानंतर आता चीन बिहारपर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा विचार करतं आहे. चीननं नेपाळला आधीच स्वतःच्या अधिपत्याखाली आणलं आहे. आता चीनचा भारत आणि दक्षिण आशियापर्यंत रेल्वेच्या माध्यमातून पोहोचण्याचा विचार असल्याची माहिती चीनच्या मीडियानं दिली आहे.
 
नेपाळमधल्या रसूवागधी या सीमावर्ती भागाला रेल्वेनं जोडण्याचा करार आधीच चीन आणि नेपाळमध्ये झाला आहे. नेपाळच्या सीमेपर्यंत चीन 2020पर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारणार आहे, अशी माहिती ग्लोबल टाइम्सनं दिली आहे. रसूवागधी या सीमेच्या माध्यमातूनच भारतात रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा विचार आहे. रसूवागधीहून बिरगुंजपर्यंत चीन रेल्वे नेणार आहे. बिरगुंजपासून बिहार फक्त 240 किलोमीटरवर आहे. या माध्यमातून चीनला कोलकाताला वेळेची बचत आणि अंतरही कमी कापून पोहोचता येणार आहे. चीनला उद्देश फक्त नेपाळच्या लोकांचा विकास करणं हा नाही.
चीनला पूर्ण दक्षिण आशियामध्ये रेल्वेचं जाळं विस्तारून अधिपत्य स्थापन करायचं आहे. नेपाळची जनता यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार असून, चीनच्या मदतीमुळे नेपाळ आधीच भारतापासून दुरावला आहे. चीनचा नेपाळच्या माध्यमातून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची आता माहिती समोर येते आहे.