शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

मालदीवचा उद्दामपणा उघड, तणावाच्या काळात मुइज्जू सरकार या मुद्द्यावर सहमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 23:27 IST

मालदीवमधून भारतीय सैन्य माघारी घेण्याबाबत दोन्ही देशांदरम्यान शुक्रवारी दिल्लीत चर्चेची दुसरी फेरी झाली.

मालदीवमधून भारतीय सैन्य माघारी घेण्याबाबत दोन्ही देशांदरम्यान शुक्रवारी दिल्लीत चर्चेची दुसरी फेरी झाली. चर्चेनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे. यानुसार, मालदीवमधील लोकांना मानवतावादी मदत आणि वैद्यकीय बचाव सेवा प्रदान करणारे भारतीय विमानचालन व्यासपीठ कार्यरत राहिले पाहिजे, यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली आहे. मात्र, मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला आहे की नाही हे या निवेदनात स्पष्ट झालेले नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पुढील बैठक होणार आहे. त्याची तारीख दोन्ही पक्षांच्या संमतीने ठरवली जाईल.

भीषण! इस्रायलचा बदला, मृत्यू आणि उपासमारीचे थैमान; गाझाचा 'हा' परिसर बनला कब्रस्तान

डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यात दुबईतील COP28 शिखर परिषदेच्या वेळी झालेल्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी कोअर ग्रुप तयार करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताला १५ मार्चपर्यंत देशातून आपले लष्करी कर्मचारी मागे घेण्यास सांगितले होते. सध्या, सुमारे ८० भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये आहेत, प्रामुख्याने दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान चालवण्यासाठी. याद्वारे शेकडो वैद्यकीय बचाव आणि मानवतावादी मदत मोहिमे पूर्ण झाली आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले होते. पदभार स्वीकारल्यानंतर, चीन समर्थक नेता मानले जाणारे मुइझू म्हणालेत की, भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना देशातून काढून टाकून त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करतील. मुइज्जू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारत समर्थक उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला होता. मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा प्रमुख सागरी शेजारी आहे आणि संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये एकूण द्विपक्षीय संबंध मागील सरकारच्या काळात प्रगती करत होते.

टॅग्स :MaldivesमालदीवNarendra Modiनरेंद्र मोदी