शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

मालदीवने केले भारताचे कौतुक, एका झटक्यात मुइज्जू सरकारचा सूर बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 21:52 IST

गेल्या काही महिन्यापूर्वी भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये संबंध बिघडले होते. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत.

गेल्या काही महिन्यापूर्वी मालदीव आणि भारताचे संबंध बिघडले होते. यामुळे भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणे टाळले होते, यामुळे मालदीवला मोठा फटका बसला होता. यानंतर मालदीव आता यातून सावरला आहे. मालदीव आता भारताचे कौतुक करत आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठी आणि सर्वात वैविध्यपूर्ण लोकशाही म्हणून उदयास आला आहे, ज्याने आपल्या देशांसह अनेक देशांना प्रेरणा देणारे उदाहरण ठेवले आहे. आपली भागीदारी लोकांमध्ये रुजलेली आहे आणि आमच्या सक्रिय द्विपक्षीय सहकार्यामुळे ती अधिक मजबूत झाली आहे. 

"ममता बॅनर्जींचा लक्ष हटवण्याचा प्रयत्न, राजीनामा द्यावा"; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर अलीकडेच द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीन-समर्थक मुइझ्झू यांनी शपथ घेतल्यापासून भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले होते. एस जयशंकर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मालदीवला भेट दिली होती आणि राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांच्यासह देशातील सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली होती. तत्पूर्वी, मुइज्जू जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्लीत आले होते. यावेळी, काही काळापूर्वी मुइज्जूने भारताकडे आपल्या लष्करी जवानांना त्यांच्या देशातून काढून घेण्याची मागणी केली होती. परस्पर चर्चेनंतर, भारताने १० मे च्या अंतिम मुदतीपर्यंत आपले जवान मागे घेतले. 

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मालदीवचे परराष्ट्र मंत्री जमीर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे हा सन्मान आहे असे सांगून जमीर यांनी राष्ट्रपती मुइज्जू, सरकार आणि मालदीवच्या जनतेच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि भारतातील जनतेला शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Maldivesमालदीव