शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मालदीवने केले भारताचे कौतुक, एका झटक्यात मुइज्जू सरकारचा सूर बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 21:52 IST

गेल्या काही महिन्यापूर्वी भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये संबंध बिघडले होते. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत.

गेल्या काही महिन्यापूर्वी मालदीव आणि भारताचे संबंध बिघडले होते. यामुळे भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणे टाळले होते, यामुळे मालदीवला मोठा फटका बसला होता. यानंतर मालदीव आता यातून सावरला आहे. मालदीव आता भारताचे कौतुक करत आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठी आणि सर्वात वैविध्यपूर्ण लोकशाही म्हणून उदयास आला आहे, ज्याने आपल्या देशांसह अनेक देशांना प्रेरणा देणारे उदाहरण ठेवले आहे. आपली भागीदारी लोकांमध्ये रुजलेली आहे आणि आमच्या सक्रिय द्विपक्षीय सहकार्यामुळे ती अधिक मजबूत झाली आहे. 

"ममता बॅनर्जींचा लक्ष हटवण्याचा प्रयत्न, राजीनामा द्यावा"; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर अलीकडेच द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीन-समर्थक मुइझ्झू यांनी शपथ घेतल्यापासून भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले होते. एस जयशंकर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मालदीवला भेट दिली होती आणि राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांच्यासह देशातील सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली होती. तत्पूर्वी, मुइज्जू जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्लीत आले होते. यावेळी, काही काळापूर्वी मुइज्जूने भारताकडे आपल्या लष्करी जवानांना त्यांच्या देशातून काढून घेण्याची मागणी केली होती. परस्पर चर्चेनंतर, भारताने १० मे च्या अंतिम मुदतीपर्यंत आपले जवान मागे घेतले. 

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मालदीवचे परराष्ट्र मंत्री जमीर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे हा सन्मान आहे असे सांगून जमीर यांनी राष्ट्रपती मुइज्जू, सरकार आणि मालदीवच्या जनतेच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि भारतातील जनतेला शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Maldivesमालदीव