शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

हवाई उत्पादनवाढीसाठी भारतात मोठ्या संधी उपलब्ध : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 19:48 IST

संरक्षण क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुक करणे शक्य आहे. त्यामुळे भारत ही जगासमोर संरक्षण उत्पादनाची मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत आहे.

ठळक मुद्देबेंगरुळू येथील एलहंका विमानतळावर बुधवारी १२ व्या एआरो इंडिया २०१९ या प्रदर्शन उद्घाटन काही वर्षात भारतात ४४३ कंपन्यांनी संरक्षण उत्पादनाचे घेतले परवाना चार वर्षात सरकारने २,८०,००० कोटी रुपयांचे १६४ प्रकल्पांना दिली मंजूरी तिन्ही संरक्षण दलासाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली जाणार संरक्षण उत्पादनांचे देशांतर्गत निर्मितीला चालना देण्यासाठी कर्नाटकातील होसुर अणि उत्तरप्रदेश येथे डिफेन्स हब उभार

बेंगळुरू : नागरी हवाई वाहतूक आणि हवाई दल यांच्याकडून विमान उद्योगाला मोठी मागणी आहे. यासाठी देशांतर्गत हवाई उत्पादनवाढीसाठी मोठ्या संधी देशात आहे. यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहे. संरक्षण क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुक करणे शक्य आहे. त्यामुळे भारत ही जगासमोर संरक्षण उत्पादनाची मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत आहे. त्यानुसार परदेशातील अधिकाधिक संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी भारतात उत्पादन केंद्रे निर्माण करावी, असे आवाहन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.  बेंगरुळू येथील एलहंका विमानतळावर बुधवारी १२ व्या एआरो इंडिया २०१९ या प्रदर्शनाचे उद्घाटन सीतारामन यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, रक्षा राज्य मंत्री सुरेश भामरे, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बिरेंद्र सिंग धानोआ, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा, संरक्षण सचिव संजय मित्रा, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव अजय कुमार तसेच विविध देशातील राजदूत तसेच संरक्षण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्तित होते. सीतारामन म्हणाल्या, भारतीय संरक्षण क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. काही वर्षात भारतात ४४३ कंपन्यांनी संरक्षण उत्पादनाचे परवाना घेतले. गेल्या चार वर्षात १,२७ ,५०० कोटी रुपयांचे १५० करार भारतीय उद्योजकांसोबत करण्यात आले. यातून तिन्ही संरक्षण दलासाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली जाणार आहे. त्याचबरोबर या चार वर्षात सरकारने २,८०,००० कोटी रुपयांचे १६४ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. ही सर्व खरेदी भारतीय उद्योजकांकडून केली जाणार आहे. संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्या अणि ऑर्डनस फॅक्टरी बोर्ड यांच्याकडील उत्पादन २०१३-१४- मध्ये ४३,७४६ कोटी होते.ते आता ५८,१६३ कोटीपर्यंत पोहचले आहे. त्यातील ४० टक्के उत्पादन हे अन्य कंपन्यांकडून अऊटसोर्स करण्यात आले अहे. मेक इन इंडिया उपक्रमांअंर्तगत सरकारने विविध योजना सुरु केल्या असून लायसन्स मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात अली अहे. सध्या देशात १० हजारहून अधिक लघु व मध्यम उद्योग संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ऑर्डन्सन फॅक्टरी मधील २७५ उत्पादने बंद करुन ती खाजगी क्षेत्राकडे सोपविण्यात आली आहेत. संरक्षण उत्पादनांचे देशांतर्गत निर्मितीला चालना देण्यासाठी कर्नाटकातील होसुर अणि उत्तरप्रदेश येथे डिफेन्स हब उभारण्यात येत अहे. त्याच धर्तीवर कोंईम्बतुर येथे अशाच प्रकारे प्रकल्प उभारण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. या डिफेन्स हब मध्ये संरक्षण उत्पादानासाठी लागणा ऱ्या  सामाजिक सुविधा उदाहरणार्थ  चाचणी केंद्र, दर्जा तपासणी केंद्र आदी सुविधा पुरविल्या जातील. महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक या परिसरात पूर्वीपासूनच संरक्षण उत्पादन संबंधित लघु व मध्यम व्यावसायिक कार्यरत आहेत. त्यांना संघटित करुन डिफेन्स कल्सटर सुरु करण्याबाबत विचार सुरु अहे.  एअरो इंडिया शो जागतिक पातळीवर मान्यता मिळाली असून त्यामुळे भारताचे जगात एक वेगळे महत्वपूर्ण स्थान निर्माण झाले आहे असेही त्या शेवटी म्हणाल्या.सुरेश प्रभु म्हणाले, भारतात हवाइ वाहतूक क्षेत्र वेगाने विस्तारीत आहे.  गेल्या चार ते पाच वर्षात यात आमूलाग्र बदल झाले आहेत.  या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. भारतात आत्तापर्यंत १०३ विमानतळ कार्यान्वित झाली अहेत. येत्या काही वर्षात आणखी १०० विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी ५५ अब्ज डॉलरची गुंतवणुक करण्यात येणार आहे. भारताचे सर्व छोटया-मोठया शहरांसह दुर्गम भाग विमानसेवेने जोडला जाणार असून त्याकरिता उडान योजना सुरु करण्यात आली आहे. परवडणाऱ्या  दरात प्रत्येकाला विमान प्रवास करिता यावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. भारतला आगामी दहा वर्षात 2300 नवीन विमानांची गरज लागणार आहे. त्याकरिता मेक इन इंडिया उपक्रमांर्तगत दीर्घकालीन धोरणाची आखणी करण्यात आली आहे. यावेळी रक्षा राज्य मंत्री सुभाष भामरे, कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :BengaluruबेंगळूरairforceहवाईदलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndian Armyभारतीय जवान