शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अजानच्या 5 मिनिटे आधी बंद करावा लागेल लाउडस्पीकर, अन्यथा...; दुर्गापूजा मांडपांना युनूस सरकारचं फरमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 21:54 IST

बांगलादेश सरकारने दुर्गापूजा मंडपांमधील विधी दरम्यान वापरण्यात येणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर, अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवण्याचे फरमान जारी केले आहे.

बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारानंतर तेथील हिंदूंची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरीम सरकारला हिंदूंची  सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले होते. यातच आता, बांगलादेश सरकारने दुर्गापूजा मंडपांमधील विधी दरम्यान वापरण्यात येणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर, अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवण्याचे फरमान जारी केले आहे. बांगलादेश सरकारच्या या आदेशाला विरोधही होत आहे.

बांगलादेश ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या गृह विभागाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी, अजान आणि नमाज दरम्यान दुर्गापूजा मंडपांमध्ये वापरलेली जाणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर बंद करावीत, असा आदेश मंगळवारी जारी केला आहे. एवढेच नाही, तर अजानच्या पाच मिनिटे आधी म्यूझिक सिस्टिम बंद करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

बांगलादेश पश्चिम बंगालला लागून आहे. यामुळे तेथे राहणाऱ्या हिंदूंची दुर्गा मातेवर अनन्य श्रद्धा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यावर्षी बांगलादेशात 32,666 पूजा मंडप उभारण्यात येणार आहेत. यांपैक ढाका दक्षिण शहरात 157 आणि उत्तर सिटी कॉर्पोरेशनमध्ये 88 मंडप असतील. गेल्या वर्षी ही संख्या 33,431 एवढी होती. मात्र यावेळी ही संख्या कमी झाली आहे. ही घट येथील हिंदूंच्या स्थितीमुळे झाली असल्याचे बोलले जात आहे.

बांगलादेश सरकारच्या या फरमानानंतर भारतात विरोध सुरू झाला आहे. कोलकात्यातील इस्कॉनचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ता राधारमण दास यांनी या आदेशाला विरोध केला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचे सल्लागार आदेश देत आहेत की, हिंदूंनी अजानच्या 5 मिनिटे आधी त्यांची पूजा, संगीत आणि कोणतेही विधी थांबवावेत अन्यथा अटकेस सामोरे जावे लागेल. हा नवीन तालिबान बांगलादेश आहे." 

टॅग्स :BangladeshबांगलादेशGovernmentसरकार