शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

दहशतवाद सोडा, चर्चेला बसा - सुषमा स्वराज यांनी पाकला सुनावले

By admin | Updated: October 2, 2015 10:22 IST

संयुक्त राष्ट्रातील महासभेत काश्मीर मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला आता परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

संयुक्त राष्ट्र, दि. २ - संयुक्त राष्ट्रातील महासभेत काश्मीर मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला आता परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानने दहशतवाद सोडून चर्चेला बसावे हा एकमेव पर्याय असल्याचे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर पाकने संयुक्त राष्ट्राला डोजियर सोपवत दहशतवादाचे खापर भारतावरच फोडले आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रातील भाषणात काश्मीर प्रश्न मांडला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरीफ यांनी चार पर्यायही दिले होते. शुक्रवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले. 'काल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चार सूत्र मांडले होते. पण मी म्हणीन पाकसाठी फक्त एकच सूत्र महत्त्वाचे आहे. पाकने दहशतवाद सोडून चर्चेसाठी बसावे असे स्वराज यांनी म्हटले आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानमध्ये उघडपणे फिरत आहे असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या सभेला जगभरातील १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुषमा स्वराज यांच्या भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. भारताच्या उत्तरानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे डोजियर सोपवत पाकमधील दहशतवासाठी भारत जबाबदार असल्याचा आरोप करत भारताविरोधातील 'पुरावे'ही सादर केल्याची माहिती पाकच्या अधिका-यांनी दिली आहे.