शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कुलभूषण जाधव खटल्यात नेमले तीन अ‍ॅमिकस क्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 01:57 IST

पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते.

इस्लामाबाद : हेरगिरी व दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून देहदंडाची शिक्षा झालेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्यामध्ये तीन पाकिस्तानी ज्येष्ठ वकिलांची अ‍ॅमिकस क्युरी म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नेमणूक केली आहे. जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याकरिता भारताला ‘आणखी एक संधी’ देण्यात यावी, असे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले आहेत.पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अबीद हसन मंटो, हमीद खान व पाकिस्तानचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मकदूम अली खान या तिघांची कुलभूषण जाधव खटल्यामध्ये अ‍ॅमिकस क्युरी म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नियुक्ती केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी विस्तारित खंडपीठासमोर होणार आहे.

पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अतार मिनल्ला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सध्या सुनावणी सुरू आहे. जाधव यांच्याकरिता वकील नियुक्त करण्यासाठी भारताला आणखी एक संधी दिली पाहिजे, असे न्या. मिनल्ला यांनी सांगितले. कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी जर पाकिस्तानी वकील नेमला, तर त्याला साह्य करण्यासाठी भारतीय वकिलांचे पथक नेमण्यात येईल का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान म्हणाले की, असा कोणताही पर्याय विचारात नाही. कायदेशीर मदतीचा मार्ग रोखला; भारताची टीकाकुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळण्याचे सर्व मार्ग पाकिस्तानने रोखून धरले आहेत, असा आरोप भारताने गेल्या महिन्यात केला होता. जाधव यांच्याकरिता वकील नेमण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती पाकिस्तान सरकारने २२ जुलै रोजी उच्च न्यायालयाला केली होती. त्या फेरविचार याचिकेची सुनावणी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे घेण्यात आली. कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेवर भारत सातत्याने टीकेची झोड उठवीत आहे.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान