शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup: “अल्पसंख्यांकासाठी पाकिस्तान सुरक्षित, विराट तू इथे ये”; मुलीच्या धमकी प्रकरणी मंत्र्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 22:03 IST

T20 World Cup: पाकिस्तानातील मंत्री खुर्रम नवाझ गंडापूर यांनी विराटला एक सल्ला दिला आहे.

इस्लामाबाद: जागतिक टी-२० विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) भारताने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने हरल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर चहुबाजूंनी टीका सुरू झाली. सर्वांत कहर म्हणजे एका सोशल मीडिया युझरने विराटच्या दहा वर्षाच्या मुलीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील एका मंत्र्याने विराट कोहलीला सल्ला दिला आहे. अल्पसंख्यांकासाठी पाकिस्तान सुरक्षित आहे. विराटने पाकिस्तानमध्ये निघून यावे, असे म्हटले आहे. 

विराट कोहलीच्या अवघ्या १० महिन्यांच्या मुलीला अत्याचाराच्या धमक्या मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मीडिया रिपोर्ट्सची दखल घेऊन दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यानेही विराटच्या कुटुंबाला मिळालेल्या धमकी प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. यातच आता पाकिस्तानातील मंत्री खुर्रम नवाझ गंडापूर यांनी विराटला एक सल्ला दिला आहे. 

अल्पसंख्यांकासाठी पाकिस्तान सुरक्षित, विराट तू इथे ये

पाकिस्तान अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित आहे. आम्ही तुमच्या व्यावसायिक क्रिकेटचा आणि तुमच्या कुटुंबाचा आदर करतो. पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या कोणत्याही संघाबाबत आपण अपशब्द केली आहे का, अशी विचारणा करत आमच्या खेळाडूंनी सामना गमावल्यास त्यांच्या कुटुंबांवर आम्ही कधीही हल्ला करत नाही. हिंदुत्व भारताचा नाश करेल. विराट तू पाकिस्तानात ये, असे ट्विट गंडापूर यांनी केले आहे. 

दरम्यान, पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही मोहम्मद शमीवर अनेकांनी अत्यंत हीन दर्जाची टीका केली होती. यावेळी तर विराटच्या कुटुंबीयांवर टीका करताना लोकांनी नीचपणाचा कळसच गाठला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट करत, प्रिय विराट, या लोकांमध्ये प्रचंड द्वेष भरला गेला आहे कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा करा. संघाचे रक्षण करा, असे म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनी मोहम्मद शामीवर टीका करणाऱ्यांनाही सुनावले. मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. लोकांची मने घृणेने भरलेली असतात कारण त्यांना कोणी प्रेम दिलेलेच नसते. त्यांना माफ करुन टाक, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१Pakistanपाकिस्तान