शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup: “अल्पसंख्यांकासाठी पाकिस्तान सुरक्षित, विराट तू इथे ये”; मुलीच्या धमकी प्रकरणी मंत्र्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 22:03 IST

T20 World Cup: पाकिस्तानातील मंत्री खुर्रम नवाझ गंडापूर यांनी विराटला एक सल्ला दिला आहे.

इस्लामाबाद: जागतिक टी-२० विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) भारताने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने हरल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर चहुबाजूंनी टीका सुरू झाली. सर्वांत कहर म्हणजे एका सोशल मीडिया युझरने विराटच्या दहा वर्षाच्या मुलीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील एका मंत्र्याने विराट कोहलीला सल्ला दिला आहे. अल्पसंख्यांकासाठी पाकिस्तान सुरक्षित आहे. विराटने पाकिस्तानमध्ये निघून यावे, असे म्हटले आहे. 

विराट कोहलीच्या अवघ्या १० महिन्यांच्या मुलीला अत्याचाराच्या धमक्या मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मीडिया रिपोर्ट्सची दखल घेऊन दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यानेही विराटच्या कुटुंबाला मिळालेल्या धमकी प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. यातच आता पाकिस्तानातील मंत्री खुर्रम नवाझ गंडापूर यांनी विराटला एक सल्ला दिला आहे. 

अल्पसंख्यांकासाठी पाकिस्तान सुरक्षित, विराट तू इथे ये

पाकिस्तान अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित आहे. आम्ही तुमच्या व्यावसायिक क्रिकेटचा आणि तुमच्या कुटुंबाचा आदर करतो. पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या कोणत्याही संघाबाबत आपण अपशब्द केली आहे का, अशी विचारणा करत आमच्या खेळाडूंनी सामना गमावल्यास त्यांच्या कुटुंबांवर आम्ही कधीही हल्ला करत नाही. हिंदुत्व भारताचा नाश करेल. विराट तू पाकिस्तानात ये, असे ट्विट गंडापूर यांनी केले आहे. 

दरम्यान, पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही मोहम्मद शमीवर अनेकांनी अत्यंत हीन दर्जाची टीका केली होती. यावेळी तर विराटच्या कुटुंबीयांवर टीका करताना लोकांनी नीचपणाचा कळसच गाठला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट करत, प्रिय विराट, या लोकांमध्ये प्रचंड द्वेष भरला गेला आहे कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा करा. संघाचे रक्षण करा, असे म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनी मोहम्मद शामीवर टीका करणाऱ्यांनाही सुनावले. मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. लोकांची मने घृणेने भरलेली असतात कारण त्यांना कोणी प्रेम दिलेलेच नसते. त्यांना माफ करुन टाक, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१Pakistanपाकिस्तान