शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

तळागाळातील लोकांबाबत न्यायव्यवस्थेचे चुकलेच!; CJI चंद्रचूड यांनी दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 05:32 IST

कायदेशीर चौकटीचा वापर पद्धतशीरपणे काही समुदायांवर अत्याचार करणे आणि त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे करण्यात आला आहे.

न्यूयॉर्क : समाजाच्या तळागाळातील वर्गाबाबत न्यायव्यवस्थेने दुर्दैवाने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या मोठे नुकसान सोसावे लागले आहे, असे पररखड मत भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या वॉल्थम येथील ब्रँडीस विद्यापीठात चंद्रचूड यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चिरंतन वारसा’ या विषयावरील सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बीजभाषण केले. ते म्हणाले की, उपेक्षित सामाजिक घटकांसंदर्भात भयंकर गंभीर चुका करण्यात आल्या. पूर्वग्रह, भेदभाव आणि विषमता यांच्या प्रभावामुळे त्या चुका घडल्या. 

ट्रान्साटलांटिक गुलामांच्या व्यापारामुळे लाखो आफ्रिकी लोकांचे बळजबरीने समूळ उच्चाटन झाले. मूळ अमेरिकी रहिवाशांचे झालेले विस्थापन, भारतातील जातीय भेदभाव, भारतातील स्थानिक आदिवासी समुदाय, महिलांवरील होणारे अत्याचार, एलजीबीटीक्यूआय व्यक्ती आणि इतर अल्पसंख्याक समुदाय यांच्यावरील भीषण अन्याय या गोष्टींनी इतिहासाची पाने डागाळली आहेत, असेही  चंद्रचूड यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

सरन्यायाधीश म्हणाले...

कायदेशीर चौकटीचा वापर पद्धतशीरपणे काही समुदायांवर अत्याचार करणे आणि त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे करण्यात आला आहे. ऐतिहासिक चुका एक सामाजिक प्रणाली निर्माण करून अन्याय कायम ठेवतात. त्यातून समाजात हिंसाचाराचा भडका उडू शकतो. उपेक्षित आणि अल्पसंख्याक समुदायांना महत्त्वाचे स्थान देण्याचा निर्णय हा केवळ कागदावरच राहू नये, तर त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे.

 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड