शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश दहशतवादी हल्ल्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा मुलगा सामील

By admin | Updated: July 4, 2016 09:30 IST

बांगलादेशमधील ढाका शहरात दहशतवादी हल्ला करुन 20 लोकांचा जीव घेणा-या दहशतवाद्यांमध्ये सत्ताधारी पक्ष आवामी लिगमधील नेत्याचा मुलगा सामील असल्याचं उघड झालं आहे

ऑनलाइन लोकमत - 
ढाका, दि. 04 - बांगलादेशमधील ढाका शहरात दहशतवादी हल्ला करुन 20 लोकांचा जीव घेणा-या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांचे फोटो जारी करण्यात आल्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. यातील एका दहशतवाद्याचं नाव रोहन इम्तियाज असून सत्ताधारी पक्ष आवामी लिगमधील नेत्याचा मुलगा आहे. रोहनचे वडील एस एम इम्तियाज खान बाबूल आवामी लिगचे नेते असून बांगलादेश ऑलिम्पिक असोसिएशनचे उप सचिव आहेत. 4 जानेवारीला रोहन बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. 
 
रोहनसोबत फोटोत दिसणा-या अन्य दोघांचीही ओळख पटली आहे. शमीम मुबाशीर आणि निबारस खान अशी यांची नावे असून दोघेही ढाकामधील नावाजलेल्या शाळेत शिक्षण घेत होते. यामधील निबारस खान याच्या फेसबुक पेजवर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत हात मिळवतानाचा फोटो असल्याचंही समोर आलं आहे.  'श्रद्धा कपूर यू ब्यूटी' असं कॅप्शन या फोटोला त्याने दिलेलं आहे.

(ढाका हल्ल्याशी इसिसचा संबंध नाही, सर्व हल्लेखोर स्थानिक)
 
ढाक्यामध्ये हॉटेलवर हल्ला करणारे दहशतवादी इसिसचे नसून, बांगलादेशातीलच आहेत अशी माहिती रविवारी बांगलादेश सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. जमायतुल मुजाहिदीन या बांगलादेशातच वाढलेल्या अतिरेकी संघटनेने हा हल्ला केला अशी माहिती गृहमंत्री असादुझामान खान यांनी दिली. दशकभरापासून बांगलादेशमध्ये या अतिरेकी संघटनेवर बंदी आहे. इस्लामिक स्टेटशी (इसिस) या संघटनेचा काहीही संबंध नाही असे खान यांनी सांगितले. 

(ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू)
 
पंतप्रधान शेख हसीना यांचे राजकीय सल्लागार हुसैन तौफीक इमाम यांनी या हल्ल्यासाठी आयएसआयला जबाबदार धरलं होतं. पाकिस्तानच्या आयएसआय आणि जमायतुल मुजाहिदीनचे संबंध जगजाहीर आहेत. आमच्या सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप हुसैन तौफीक इमाम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. 
'जर आवामी लिग पक्षातील नेत्याचा मुलगा दहशतवादी होऊ शकतो तर मग जमायतुल मुजाहिदीन बांगलादेश संघटनेशी संबंधित कोणतीही गोष्ट परिस्थिती बिघडवू शकते', असा दावा गुप्तचर संघटनेने केला आहे. 
 
याअगोदरही गुप्तचर खात्याने जमायतुल मुजाहिदीन बांगलादेश  आणि जमात-ए-इस्लामीचे सदस्य आपली शिक्षा रद्द व्हावी यासाठी आवामी लिगच्या छताखाली येण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती. आवामी पक्षाचं नाव असल्यास पासपोर्ट आणि व्हिसा मिळणं सोपं होतं. त्यातही भारतामध्ये प्रवेश करणं एकदम सोपं होऊन जातं. आवामी लिगमध्ये दहशतवादी घटक सामील असल्याचा दावा याआधीही एका वरिष्ठ सरकारी अधिका-याने केला होता. 
 
ओलिस धरलेले व मृतांमध्ये बहुसंख्य विदेशी नागरिक व दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे हत्याकांड आम्ही घडविल्याचा दावा इस्लामिक स्टेटने (इसिस) केला होता. होले आर्टिसन बेकरीत घुसून दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री सुरू केलेले हे ओलिस धरून केलेले हत्याकांड सत्र ११ तासांनी शनिवारी संपले. लष्कराने बेकरीवर कारवाई केली त्यात सहा हल्लेखोर ठार झाले, तर एकाला जिवंत पकडण्यात आले.
 
हल्लेखोरांनी ओलिसांची ज्या मोठ्या कोयत्याने हत्या केली ती बघता त्यात बंदी घालण्यात आलेल्या स्थानिक जमात- उल- मुजाहिदीन या दहशतवादी गटाचा हात असल्याचे सूचित होते, असे पंतप्रधान शेख हसीना यांचे राजकीय सल्लागार हुसेन तौफिक इमाम यांनी म्हटले. आयएसआय आणि जमातमधील संबंध सर्वांना माहीत आहेत. त्यांना सध्याचे सरकार काढून टाकायचे आहे, असे इमाम दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याकडे महत्त्वाची माहिती आहे, असेही ते म्हणाले.
 
ओलिस धरून ठार मारलेल्यांमध्ये १९ वर्षांची भारतीय तरुणी तारिशी जैन, नऊ इटालियन, सात जपानी, एक बांगलादेशी वंशाचा अमेरिकन, दोन बांगलादेशींचा समावेश आहे. बहुतेक मृतांचा गळा चिरल्याचे आढळले आहे.