शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

'हे केवळ अयोध्येवरच थांबणार नाही, आता ज्ञानवापी अन्...'; पाकिस्तानचा थयथयाट, UN कडे केली रडारड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 12:48 IST

मुनीर अक्रम यांनी युनायटेड नेशन्स अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशनचे उच्च अधिकारी मिगुएल एंजल मोराटिनोस यांना उद्देशून लिहिलंय पत्र...

अयोध्येत रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासूनच पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. यातच आता पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे (यूएन) धाव घेतली आहे आणि भारतातील इस्लामिक स्थळांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे दूत मुनीर अकरम यांनी बुधवारी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या एका बैठकीदरम्यान ही मांगणी केली आहे. ही बैठक ओआयसीच्या सदस्य देशांची होती.

यापूर्वी अयोध्येत रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत याचा निषेध केला होता. आपल्या निवेदनात पाकिस्तानने म्हटले होते की, 6 डिसेंबर 1992 रोजी जमावाने शतकानुशतके उभी असलेली मशीद पाडली. भारतातील सर्वाच्च न्यायालयाने या घटनेला जबाबदार असलेल्यांना निर्दोष मुक्त केले. एवढेच नाही तर त्याच ठिकाणी राम मंदिर उभारणीलाही मंजुरी देण्यात आली.  हे निंदनीय आहे.

पाकिस्तानने UN कडे केली अशी मागणी - पाकिस्तानची न्यूज वेबसाइट 'द डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुनीर अक्रम यांनी युनायटेड नेशन्स अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशनचे उच्च अधिकारी मिगुएल एंजल मोराटिनोस यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यात म्हणण्यात आले आहे की, "भारतातील अयोध्येमध्ये पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधण्याचा आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा पाकिस्तान तीव्र निषेध करतो. हा ट्रेंड भारतीय मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणाबरोबरच, प्रदेशातील सौहार्द आणि शांततेलाही गंभीर धोका निर्माण करतो."

UN ला लिहिलेल्या पत्रात मुनीर अकरम यांनी म्हटले आहे की, भारतातील मुस्लीम धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेसाठी आपण तात्काळ हस्तक्षेप करावा, यासाटी मी हे पत्र लिहित आहे. संयुक्त राष्ट्रांने इस्लामशी संबंधित वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आणि भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याकांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडायला हवी.

ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशिदीसंदर्भातरही व्यक्त केली चिंता -मुनीर अकरम यांनी पुढे म्हटले आहे, अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा, भारतातील मशिदी नष्ट करण्याचा प्रयत्न आणि धार्मिक भेदभाव दर्शवतात. प्रकरण बाबरी मशिदीच्याही पलीकडे गेले आहे. भारतातील इतर मशिदींनाही अशाच प्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. दुर्दैवाने, ही एकच घटना नाही. कारण वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील शाही इदगाह मशिदीसह इतर मशिदींनाही, अशा धोक्याचा सामना करावा लागू शकतो."

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ