शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

इस्तंबुल विमानतळ स्फोटांनी हादरले, 36 जणांचा मृत्यू, 147हून अधिक जखमी

By admin | Updated: June 29, 2016 09:11 IST

टर्कीचे प्रमुख शहर असलेल्या इस्तंबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या दोन स्फोटांनी हादरले.

ऑनलाइन लोकमतइस्तंबुल, दि. 29 - टर्कीचे प्रमुख शहर असलेल्या इस्तंबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या दोन स्फोटांनी हादरले. या भीषण स्फोटात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 147 हून अधिक जण जखमी आहेत. हा हल्ला दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच इसिसनं केल्याची शक्यता तुर्कीनं व्यक्त केली आहे. मृतांचा आकडा 50 पर्यंत वाढण्याची भीती तुर्की सरकारच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे, असं वृत्त द गार्डियन या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.  

इस्तंबुल विमानतळावरून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. द गार्डियनच्या माहितीनुसार एके 47 असलेल्या काही अज्ञात बंदुकधारी दहशतवाद्यांनी इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या बंदुकधारी दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणला. अचानक झालेल्या या दोन स्फोटानंतर उपस्थित प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक जण आपला जीव वाचविण्यासाठी जमिनीवर झोपले तर काहींनी इमारतीमध्ये धाव घेतली. या वर्षातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते.

या हल्ल्यानंतर टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दहशतवादाविरोधात सर्वांना एकत्र येऊन लढण्याचं आवाहन केलं आहे. या वर्षातील इस्तंबुलमध्ये झालेला हा चौथा मोठा दहशतवादी हल्ला आहे. कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हल्ल्यानंतर इस्तंबुल विमानतळावरुन सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 
 
मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरु असताना तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला केला असे इस्तंबुलचे राज्यपाल वासीप साहीन यंन सांगितले. सुरक्षा कॅमे-यांनी हे दोन्ही बॉम्बस्फोट टिपले असून, एका क्लिपमध्ये टर्मिनल बिल्डींगच्या प्रवेशव्दारातून आगीचा मोठा लोळ येताना दिसत असून, भेदरलेले प्रवासी सैरवैरा पळत आहेत. 
 
दुस-या व्हिडीओमध्ये काळपोषाख परिधान केलेला एक दहशतवादी इमारतीमध्ये पळताना दिसत आहे. स्फोटाच्या आवाजानंतर विमानतळावरील प्रवासी सर्व दिशांना पळत सुटले असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. कुर्दीश बंडखोर आणि इसिसच्या दहशतवाद्यांवर या हल्ल्याचा संशय आहे. मार्च महिन्यात युरोपमधील ब्रसेल्स विमानतळावर अशाच पद्धचीने बॉम्बस्फोट झाले होते. दोन्ही विमानतळावरील आत्मघातकी हल्ल्याची पद्धत एकसारखीच आहे. ब्रसेल्स हल्ल्यात ३२ जण ठार झाले होते.