शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

महागाईने त्रस्त श्रीलंकावासीयांना अपेक्षा भारताकडूनच !

By किरण अग्रवाल | Updated: April 12, 2022 14:26 IST

Srilanka Crisis : महागाईने त्रस्त श्रीलंकावासीयांना आता केवळ भारताकडूनच अपेक्षा आहेत.

- किरण अग्रवाल

कँडी - महागाईने त्रस्त झालेल्या श्रीलंकेतील नागरिकांना या अडचणीच्या काळात भारताकडूनच मदतीची आस असून, आंतरराष्ट्रीय राजकारणाशी घेणेदेणे नसलेले लोक भारतच आपल्याला वाचवू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. 

श्रीलंकेत महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडायला आले आहे. देशाची राजधानी कोलंबोपासून कँडीपर्यंत ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. टंचाई असल्याने इंधनाची दरवाढ झाली आहेच, विजेची टंचाई असल्याने भार नियमनही करावे लागत आहे. अगदी कोलंबोतील आंतरराष्ट्रीय भंडारनायके विमानतळावरदेखील अनावश्यक विजेचा वापर रोखण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसून आले. येथे उतरतांना नेहमी रात्रीच्या वेळी विमानातून जो लखलखाट दिसून येई तो यंदा दिसला नाही. बहुतेक रस्ते व इमारतींमधले लाईट गुल होते.

दरम्यान, श्रीलंकेबाहेर येथील महागाईचा हाहाकार व राजकीय आंदोलनाचे जे चित्र दाखवले जाते आहे त्यामुळे पर्यटनाला फटका बसल्याने त्यावर अवलंबून असलेले प्रचंड नाराज आहेत. प्रत्यक्षात येथे पर्यटकांना कुठलीही अडचण जाणवत नाही. भारतातून येणाऱ्यांचे तर मनोभावे वेलकम केले जात आहे. श्रीलंकेचे माजी केंद्रीय मंत्री तथा प्रख्यात क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा व सनथ जयसूर्या यांनी व्यक्त केलेल्या भावनेला दुजोरा देत भारतच आमच्या कामी येणारा असून, तोच जन्मजात मोठा भाऊ असल्याचे टॅक्सी चालक प्रियांत सापरमडू सांगतात. 

इंडिया, देन नो प्रॉब्लेम; वेलकम!

चेन्नईवरून कोलंबो विमानतळावर पोहोचलेल्या भारतीय पर्यटकांच्या एका ग्रुपला 'यू आर फ्रॉम इंडिया, देन नो प्रॉब्लेम; आयु बोवन.. म्हणजे वेलकम...'  म्हणत फारशा चौकशा न करता सहकार्य केले गेले. 

सत्तेच्या राजकारणातून 

वाढलेल्या महागाईचा फटका गरीब वर्गालाच बसत असून तोच दुकाने व पंपासमोर रांगेत उभा दिसत आहे. उच्चभ्रू वर्ग मात्र यात कुठेच नाही. येथे जे काही सुरू आहे ते सत्तेच्या राजकारणातून होत असल्याचा संतापही अनेकजण व्यक्त करतांना दिसतात.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInternationalआंतरराष्ट्रीय