शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चीनच्या सैनिकांची लडाखमध्ये घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 06:12 IST

चिनी सैनिकांनी मंगळवारी सकाळी दोनदा लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे.

लेह/बीजिंग : डोकलामवरून भारत व चीन यांच्यातील तणाव सुरू असतानाच चिनी सैनिकांनी मंगळवारी सकाळी दोनदा लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. मात्र, असे काही घडल्याची आपणास माहिती नाही, अशी साळसूद भूमिका चीन सरकारने घेतली आहे. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यानेही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.पँगाँग भागात घुसखोरी करणाºया भारतीय जवानांनी अटकाव केल्यानंतर चीनच्या सैनिकांनी त्यांच्यावर दगडफेकही केली. शिवाय दोन्हीकडील सैनिकांमध्ये सुमारे अर्धा तास धक्काबुक्की झाल्याचेही वृत्त आहे. त्यांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत काही जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येते. घुसखोरीचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले.मंगळवारी, भारताच्या स्वातंत्र्य दिनीच चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी सकाळी ६ आणि त्यानंतर पुन्हा ९ वाजता भारतीय सीमा भागातील फिंगर फोर आणि फिंगर फाइव्ह भागात घुसण्याचा प्रयत्न केला. यापैकी फिंगर फोर भागात प्रवेश करण्यात चीनच्या सैनिकांना यश आले.मात्र भारतीय जवानांनी त्यांनालगेच अडवून माघारी तेथून हाकलूनदिले. भारतीय जवानांच्या अटकावापुढे घुसखोरी करणे शक्य होत नसल्याचेलक्षात आल्यानंतर चिनी सैनिकांनीभारतीय जवानांवर दगडफेक केली.मात्र त्यालाही भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.>पंतप्रधान मोदींनी घेतली अधिकाºयांची बैठकचीनला लागून असलेल्या तिन्ही सीमांवरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर विभागाचे संचालक, रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंगचे सचिव व महत्त्वाचे संरक्षण अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे भाषण संपताच त्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. मात्र, संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी तेथील परिस्थितीबद्दल काहीहीभाष्य केले नाही.>भारताचा पहारालडाखचा फिंगर फोर भाग आपला असल्याचे दावा चीनने सुरू केला भारताने १९९0 झालेल्या चर्चेच्या वेळी त्या भागावर आपला दावा केला होता. मात्र, त्यानंतर फिंगर फोरपर्यंत रस्ता बनवून हा अक्साई चीनचा भाग असल्याचे सांगण्यास सुरुवात केली.सुरुवातीला चिनी सैनिक तलावाच्या उत्तर आणि दक्षिण काठाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र, आता या भागात भारताचा सशस्त्र पहारा आहे.