शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

भारतातील सत्ताधारी निवडणुकीमुळे युद्धाला आतुर झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:21 IST

पाकच्या मंत्र्याचा कांगावा : स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तराचा आम्हाला हक्क

इस्लामाबाद : भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून ‘आक्रमण’ केले आहे आणि त्याला उत्तर देण्याचा पाकिस्तानला हक्क आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले. पाकिस्तानच्या बाजूकडील नियंत्रण रेषा मंगळवारी पहाटे ओलांडून भारतीय हवाई दलाने अनेक ठिकाणचे दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट केल्यानंतर कुरेशी यांनी वरील भाष्य केले.

भारताच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान इम्रान खान होते. कुरेशी म्हणाले की, भारताने पाकिस्तानवर आज आक्रमण केले आहे.

या बैठकीची थोडक्यात माहिती परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी नंतर पंतप्रधान इम्रान खान यांना दिली. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या लष्कराने मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेचे भारतीय हवाई दलाने उल्लंघन केल्याचा आरोप केला. भारतीय विमानाने मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरी केली. त्याला पाकिस्तानच्या हवाई दलाने योग्य वेळी व परिणामकारक उत्तर दिले. त्यावेळी तेथून पळून जाताना त्याने घाईघाईत बालाकोटजवळ बॉम्ब टाकला. कोणतीही जीवितहानी झाली नाही की नुकसान, असे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक व मेजर जनरल असिफ गफूर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने ताबडतोब कारवाई करताच भारतीय विमान परत गेले, असे त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)सिनेटर व पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या नेत्या शेरी रहमान म्हणाल्या की, नियंत्रण रेषा ओलांडून भारताने केलेले आक्रमण हे व्यूहरचनेच्या दृष्टीने चुकीचे आणि डावपेचाच्या संदर्भात निरर्थक आहे. अशा चाली या फक्त संताप निर्माण झालेल्या विभागात तणाव निर्माण करतात. हे उघडच आहे की भारतातील सत्ताधारी पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी दुसरा काही मार्ग दिसत नसल्यामुळे तो युद्धाला आतुर झाला आहे, असे रहमान यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारत सरकारने देशांतर्गतच्या दबावामुळे लाक्षणिक घुसखोरी केली आहे, असे म्हटले.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक