शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिस मसुद्यावर भारताचा आक्षेप

By admin | Updated: December 10, 2015 23:22 IST

ग्लोबल वॉर्मिंग आटोक्यात ठेवण्यासाठी करावयाच्या अंतिम करारावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी देशांनी करावयाचे स्वेच्छा संकल्प, तसेच इतर अनेक बाबी संभाव्य अंतिम मसुद्यामध्ये समाविष्ट

पॅरिस : ग्लोबल वॉर्मिंग आटोक्यात ठेवण्यासाठी करावयाच्या अंतिम करारावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी देशांनी करावयाचे स्वेच्छा संकल्प, तसेच इतर अनेक बाबी संभाव्य अंतिम मसुद्यामध्ये समाविष्ट न केल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. या मसुद्याबाबत भारत सहमत नसल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पर्यावरण परिषदेच्या चर्चेदरम्यान जावडेकर यांनी भारताचे आक्षेप नोंदवले. शुक्रवारी परिषदेचा अंतिम दिवस असून परिषदेत करावयाच्या करारावर अद्याप सहमती झालेली नाही. पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सियसने कमी करण्यासाठी विकसित देशांनी आपल्या कार्बन उत्सर्जनामध्ये अधिक कपात करण्याची गरज असून विकसनशील देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्येही वाढ केली पाहिजे. प्रदूषणाची पातळी औद्योगिकरणापूर्वीची असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. जावडेकर म्हणाले की, राष्ट्रीय निर्धारित योगदान ही संकल्पना अभूतपूर्व असून त्यामुळे 186 देशांचा सहभाग निश्चित झाला असला तरी या संकल्पनेचा उल्लेखच संभाव्य मसुद्यामध्ये नाही. पॅरिस परिषदेतील मंत्रीस्तरीय बैठकीनंतर तयार झालेला पहिला मसुदा जारी करण्यात आला असून भारताने यावर आक्षेप घेतला आहे. आर्थिक मुद्यांचा उल्लेख करून जावडेकर म्हणाले की, विकसित देशांनी याही बाबतीत निराशा केली. आपली जबाबदारी ते विकसनशील देशांवर ढकलत आहेत. विकसित देश आर्थिक मदतीत वाढ तर करीत नाहीत, पण याबाबतची त्यांची दिशाही निश्चित नाही. पर्यावरण रक्षणाचे लक्ष्य व तत्त्वांमधील भेद यांना सारखेच महत्त्व असून एकाशिवाय दुसरा व्यर्थ आहे, पण विकसित देश हे विचारात घ्यायला तयार नाहीत.२००९ मध्ये झालेल्या परिषदेत पृथ्वीचे तापमान २ अंशांनी कमी करण्याची चर्चा झाली. बेटे व कमी विकसित देश यांचे मत आहे की, हे निर्धारण किमान १.५ अंश तरी असावे. विकसित देशांनी यात पुढाकार घेतला नाही तर हे लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही, असे मत भारतातील पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. (वृत्तसंस्था)