शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

पॅरिस मसुद्यावर भारताचा आक्षेप

By admin | Updated: December 10, 2015 23:22 IST

ग्लोबल वॉर्मिंग आटोक्यात ठेवण्यासाठी करावयाच्या अंतिम करारावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी देशांनी करावयाचे स्वेच्छा संकल्प, तसेच इतर अनेक बाबी संभाव्य अंतिम मसुद्यामध्ये समाविष्ट

पॅरिस : ग्लोबल वॉर्मिंग आटोक्यात ठेवण्यासाठी करावयाच्या अंतिम करारावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी देशांनी करावयाचे स्वेच्छा संकल्प, तसेच इतर अनेक बाबी संभाव्य अंतिम मसुद्यामध्ये समाविष्ट न केल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. या मसुद्याबाबत भारत सहमत नसल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पर्यावरण परिषदेच्या चर्चेदरम्यान जावडेकर यांनी भारताचे आक्षेप नोंदवले. शुक्रवारी परिषदेचा अंतिम दिवस असून परिषदेत करावयाच्या करारावर अद्याप सहमती झालेली नाही. पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सियसने कमी करण्यासाठी विकसित देशांनी आपल्या कार्बन उत्सर्जनामध्ये अधिक कपात करण्याची गरज असून विकसनशील देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्येही वाढ केली पाहिजे. प्रदूषणाची पातळी औद्योगिकरणापूर्वीची असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. जावडेकर म्हणाले की, राष्ट्रीय निर्धारित योगदान ही संकल्पना अभूतपूर्व असून त्यामुळे 186 देशांचा सहभाग निश्चित झाला असला तरी या संकल्पनेचा उल्लेखच संभाव्य मसुद्यामध्ये नाही. पॅरिस परिषदेतील मंत्रीस्तरीय बैठकीनंतर तयार झालेला पहिला मसुदा जारी करण्यात आला असून भारताने यावर आक्षेप घेतला आहे. आर्थिक मुद्यांचा उल्लेख करून जावडेकर म्हणाले की, विकसित देशांनी याही बाबतीत निराशा केली. आपली जबाबदारी ते विकसनशील देशांवर ढकलत आहेत. विकसित देश आर्थिक मदतीत वाढ तर करीत नाहीत, पण याबाबतची त्यांची दिशाही निश्चित नाही. पर्यावरण रक्षणाचे लक्ष्य व तत्त्वांमधील भेद यांना सारखेच महत्त्व असून एकाशिवाय दुसरा व्यर्थ आहे, पण विकसित देश हे विचारात घ्यायला तयार नाहीत.२००९ मध्ये झालेल्या परिषदेत पृथ्वीचे तापमान २ अंशांनी कमी करण्याची चर्चा झाली. बेटे व कमी विकसित देश यांचे मत आहे की, हे निर्धारण किमान १.५ अंश तरी असावे. विकसित देशांनी यात पुढाकार घेतला नाही तर हे लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही, असे मत भारतातील पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. (वृत्तसंस्था)