शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

जागतिक शांततेसाठी ७० वर्षांत भारतीयांचे सर्वाधिक बलिदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:03 IST

गेल्या सत्तर वर्षांत जगभरातील शांती मोहिमांमध्ये कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक बलिदान भारतीय शांतीसैैनिकांनी दिले आहे.

संयुक्त राष्ट्रे : गेल्या सत्तर वर्षांत जगभरातील शांती मोहिमांमध्ये कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक बलिदान भारतीय शांतीसैैनिकांनी दिले आहे. त्यांची संख्या १६३ असून त्यात लष्करी जवान, पोलिस व नागरिकांचा समावेश आहे.संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, १९४८ सालापासून ते आजवर जगभरातील शांती मोहिमांत ३७३७ शांतीरक्षकांनी बलिदान दिले. त्यात भारतातील शांतीरक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांनी हाती घेतलेल्या शांती मोहिमांमध्ये मोठ्या संख्येने आपले पोलीस व लष्करी जवान पाठविणाऱ्या अग्रणी देशांत भारत तिसºया क्रमांकावर आहे. अ‍ॅबेई, सायप्रस, काँगो, हैती, लेबनॉन, मध्य पूर्वेतील देश, दक्षिण सुदान, पश्चिम सहारा भाग येथे सध्या सुरु असलेल्या शांती मोहिमांत भारताचे ६६९३ शांतीरक्षक सहभागी झाले आहेत. या शांतीरक्षकांना शस्त्रसज्ज करण्यासाठी तसेच अन्य तयारीपोटी गेल्या ३० एप्रिलपर्यंतची मुदत लक्षात घेतल्यास संयुक्त राष्ट्रांकडून भारताला ९ कोटी २० लाख डॉलर इतकी रक्कम येणे आहे.संयुक्त राष्ट्रांनी शांती मोहिमा सुरु केल्याच्या घटनेला यंदा ७० वर्षे पूर्ण झाली तसेच शांतीरक्षक दिनानिमित्त मंगळवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात शांतीरक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. सध्या जगभरात सुरु असलेल्या चौदा शांती मोहिमांमध्ये विविध देशांतील पोलिस व लष्करातील ९६००० हजार जवान सहभागी झाले असून १५ हजार नागरिक या मोहिमांतील कर्मचारी व १६०० जण कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत.संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी या वेळी बोलताना सांगितले की, जगभरातील शांती मोहिमांमध्ये गेल्या सत्तर वर्षांत १० लाख पुरुष व महिला सहभागी झाले आहेत. त्यांनी अनेक निरपराधी लोकांचे जीव वाचविले आहेत. २०१७ साली शांती मोहिमांत विविध देशांतील १३७ शांतीरक्षकांना आपला जीव गमावावा लागला होता.