शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

भारताचे मदतकार्य, चीनसाठी डोकेदुखी!

By admin | Updated: May 1, 2015 01:59 IST

नेपाळमध्ये महाप्रलयकारी भूकंप आल्यानंतर सर्वात आधी नेपाळमध्ये पथके दाखल झाली, ती एनडीआरएफ अर्थात नॅशनल डिझास्टर रिपॉन्स फोर्सची. ‘एनडीआरएफ’ने मदत आणि बचावकार्यात मोठी आघाडी घेतली.

काठमांडू : नेपाळमध्ये महाप्रलयकारी भूकंप आल्यानंतर सर्वात आधी नेपाळमध्ये पथके दाखल झाली, ती एनडीआरएफ अर्थात नॅशनल डिझास्टर रिपॉन्स फोर्सची. ‘एनडीआरएफ’ने मदत आणि बचावकार्यात मोठी आघाडी घेतली. ढिगाऱ्यांखाली अडकलेले मृतदेह काढण्यात त्यांनी मोलाचे काम केले. एनडीआरएफ पाठोपाठ नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले. नेपाळमध्ये भारतीयांचे होणारे कौतुक चीनसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. नेपाळमध्ये भारताचा वाढत असलेला प्रभाव, नेपाळी जनतेमधून भारतीयांना मिळत असलेली आपुलकी चीनची अस्वस्थता वाढवणारी आहे. नेपाळमध्ये पाय पसरण्यासाठी चीन गेल्या २५-३० वर्षांपासून प्रयत्नशील आहे. नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आल्यानंतर माओवाद्यांचा प्रभावही कमीकमी होत आहे. सध्या नेपाळमध्ये माओवाद्यांचा प्रभाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात भारतात उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले. नेपाळच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळशी सलोख्याचे संबंध राखण्याकडे कटाक्ष ठेवला. संरक्षणाच्या दृष्टिनेही नेपाळची भूमी भारतासाठी संवेदनशील आहे. त्यामुळे भारताने मोठ्या भावाची भूमिका बजावत नेपाळसाठी मदतीचा हात दिला असला तरीदेखील त्याला अनेक पदर आहेत. मानवतेचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहेच, पण भारतासाठी संरक्षणासह अन्य बाबी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे एक हजार स्वयंसेवक सध्या नेपाळमध्ये मदतकार्यात सहभागी झालेले आहेत. संघाचे सहसरकार्यवाह दत्ता होसबळे देखील रविवारपासून नेपाळमध्ये तळ ठोकून आहेत. होसबळे यांना चीन संदर्भातील प्रश्नांबाबत छेडले असता, त्यांनी अतिशय सावध उत्तरे दिली.भारतीय मदत चीनला खुपतेय का, यावर ते म्हणाले, आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून येथे मदतकार्यात सहभागी झालेलो आहोत. काही प्रश्न राजकीय असतात, त्याला राजकीय उत्तरे त्या-त्या वेळी मिळतात. तथापि, भारताचा नेपाळी जनतेच्या मनातील वाढणारा प्रभाव चिनी ड्रॅगनची झोप उडवणारा असल्याचे होसबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मान्य केले. नेपाळला भूकंपाचा भीषण धक्का बसला त्याला आता पाच दिवस उलटले आहेत. आपत्तीशी झगडणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी घटना गुरुवारी घडली असून, १२० तास ढिगाऱ्याखालील किशोरवयीन मुलाची सुखरूप सुटका हा एक चमत्कारच मानावा लागेल. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय येण्याचीच ही वेळ. काठमांडू शहरात गुरुवारी असाच चमत्कार घडला. १५ वर्षांच्या मुलाला पाच दिवसांनंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पेम्बा लामा असे या मुलाचे नाव आहे.