शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

म्हणे, बलुचिस्तान ट्रेन अपहरणामागे भारताचा हात; शाहबाज सरकारने तोडले तारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:19 IST

काल मंगळवारी पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये ५०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचे बलुच बंडखोरांनी अपहरण केले.

काल पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये ५०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचे बलुच बंडखोरांनी अपहरण केले. दरम्यान, आता या दहशतवादी हल्ल्याबाबत, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी रेल्वे अपहरणावरून भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

बलुच बंडखोरांनी नागरिक, महिला आणि मुलांना सोडले होते, तर पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी, गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुच बंडखोरांनी २१४ प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावाही केला आहे.

बराक ओबामा - पत्नी मिशेल यांचा घटस्फोट? पॉडकास्टच्या माध्यमातून देणार 'फायनल' उत्तर

दरम्यान, आता पाकिस्तानने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने भारतावर खापर फोडायचा प्रयत्न केला आहे.  पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी बलुचिस्तान ट्रेन अपहरण घटनेबाबत भारतावर निराधार आरोप केले आहेत. राणा सनाउल्लाह यांनी दावा केला की 'या हल्ल्यामागे भारताचा हात आहे.' ते म्हणाले, "भारत हे हल्ले अफगाणिस्तानच्या आतून करत आहे. यावेळ पत्रकारांनी त्यांना विचारले की,'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुच बंडखोरांमध्ये काही संबंध आहे का?' टीटीपी बलुचांना पाठिंबा देते का? तर याला उत्तर देताना राणा सनाउल्ला म्हणाले, 'भारत हे सर्व करत आहे, यात काही शंका नाही. 

राणा सनाउल्लाह म्हणाले, 'अफगाणिस्तानात बसून ते सर्व प्रकारचे कट रचतात. पाकिस्तानचे शत्रू सक्रिय आहेत आणि आता त्याबद्दल दुसरे मत नाही. हा राजकीय मुद्दा नाही किंवा कोणत्याही अजेंड्याचा भाग नाही, तर एक कट आहे. भारतावर गंभीर आरोप करत ते म्हणाले, 'हो, भारत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुच लिबरेशन आर्मी दोघांनाही पाठिंबा देत आहे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान