शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा पाकपुढे मैत्रीचा हात

By admin | Updated: December 9, 2015 23:29 IST

भारताने पाकिस्तानकडे आज मैत्रीचा हात पुढे केला. दोन्ही देशांसाठी एकमेकांसोबत काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे सांगतानाच अतिरेक्यांना कुठल्याही स्वरूपात आश्रय देऊ नका

इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानकडे आज मैत्रीचा हात पुढे केला. दोन्ही देशांसाठी एकमेकांसोबत काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे सांगतानाच अतिरेक्यांना कुठल्याही स्वरूपात आश्रय देऊ नका, असे आवाहन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. हार्ट आॅफ एशिया संमेलनात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, अतिरेकी कारवाया करणाऱ्या शक्तींना कुठल्याही नावाने, कुठल्याही स्वरूपात आश्रय देण्यात येऊ नये. विशेषत: आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष द्यावे. जग बदलाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी भारताने पाकिस्तानला विकासासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला. सुषमा स्वराज म्हणाल्या की, भारत एका अशा अफगाणिस्तानची कल्पना करतो जो की, व्यापार, परिवहन, ऊर्जा आणि संचार यांनी परिपूर्ण केंद्र असेल. पाकिस्तानसोबत विकासाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी किंबहुना त्यांना सहकार्य करण्यासाठी आमची तयारी तर आहेच; पण तूर्तास अफगाणिस्तानच्या मदतीचा संकल्प तर करू या. दरम्यान, अफगाणिस्तानच्या मुद्यावर बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, त्या देशात अतिरेकी कारवायांचे क्षेत्र आणि तीव्रता यात मोठी वाढ झाली आहे. अफगाणिस्तान सरकारसोबत काम करण्यास, त्यांची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी आम्ही सहकार्य करू. (वृत्तसंस्था)भारत आणि पाकिस्तान परस्पर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली. यावेळी भारताचे परराष्ट्रसचिव एस. जयशंकर व शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अजीज यांची उपस्थिती होती.सुषमा स्वराज म्हणाल्या की, पाकिस्तानसोबतही आम्ही मैत्रीचा हात पुढे करण्यास तयार आहोत. ती वेळ आता आली आहे की, आम्ही एकत्र काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्मविश्वास आणि समजूतदारपणा दाखविण्याची गरज आहे. व्यापार व सहकार्य मजबूूत करायला हवे. कारण, संपूर्ण जग त्या क्षणाची वाट पाहत आहे. आम्ही त्यांना निराश करायला नको.सार्क परिषद सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानात होणार आहे. यापूर्वी जानेवारी २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. वाजपेयींनंतर पंतप्रधान बनलेले मनमोहनसिंगही पाकिस्तानचा दौरा करू इच्छित होते. मात्र त्यांना शक्य झाले नाही.सार्क शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी पाकिस्तानचा दौरा करतील, असे स्वराज यांनी सांगितले.